सोमवार, २७ जुलै, २०२०

७६ आर्थिक उन्नती

                                         ७६ आर्थिक उन्नती 
        जोपर्यंत आर्थिक दृष्टीने दुसऱ्यावर अवलंबून राहणे आहे, तोपर्यंत भारतातील कोट्यावधी लोकांना आर्थिक उन्नतीची समान संधी नाही, जोपर्यंत त्यांच्याजवळ उन्नतीची साधने नाहीत, उन्नतीचे प्रवेशद्वार अजून उघडले नाही तोपर्यंत विश्वाच्या प्रगतीमध्ये भारत सहाय्यक होऊ होऊ शकत नाही. तो जीवनाच्या सत्याचा साक्षात्कार करू शकणार नाही आणि मानवाच्या स्वातंत्र्याचा साक्षात्कारही करू शकत नाही                    - दीनदयाळ उपाध्याय

 “जेव्हा सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील बदलाचा विषय येतो तेव्हा आपली दृष्टी काय असते?

"सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:

प्रत्येकाने सुखी आणि आनंदी असावे,प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहावे, सगळ्यांचे कल्याण व्हावे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या  सामाजिक व आर्थिक चिंतनाचा गाभा सांगणारे हे सुभाषित आहे. शोषण विरहित आणि समानता युक्त समाज व आर्थिक व्यवस्था आपल्याला अभिप्रेत आहे.”                मा.बाळासाहेब देवरस 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा