मंगळवार, २१ जुलै, २०२०

५३ समष्टी जीवन

                                        ५३  समष्टी जीवन 
       
१ 
         आपण आपले गुण आचरणातून प्रगट करून समष्टी जीवनाचे आदर्श स्वरूप निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी समाजाशी, परस्परांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. स्नेह, आदर, विश्वास यांनी ओतप्रोत असे व्यवहार आपल्या जीवनात साकार करून दाखवू या.  या कार्यात यश मिळावयास पाहिजेच. अशा पद्धतीने केलेल्या तेजस्वी कार्याच्या गतिमानतेतच बाह्य परिस्थिती अडथळे उत्पन्न करील हे सर्वस्वी अशक्य आहे. माझ्या अंतःकरणातील ही श्रद्धा आहे. हीच श्रद्धा आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात जागविली. कार्य यशस्वी होणारच. ते यशस्वी होईल तसेच ते मजबूतही होईल. कार्याचा जयजयकार सर्वत्र होईल आणि आपण भारताची जशी प्रतिमा उभी करू इच्छितो तशीच ती साकार होईल.
                                                                                                                       श्रीगुरुजी
२ 
       अहं विसरणारी व्यक्ती परिवार व समाजाशी एकरुप होते. तसेच मानवतेशी व संपूर्ण विश्वाशीही एकरूप होऊ शकते. अहम् चा संपूर्णपणे लोप करण्याचा संस्कार, दररोज एकत्र येऊन सामूहिक कार्यक्रमांतून, सामूहिक मनांच्या निर्मितीतून होत असतो. समष्टिगत कार्यक्रमांच्या माध्यमातून समष्टीगत भाव निर्माण होत असतो या मानसशास्त्रीय सिद्धांताचे आधारावरूनच आपल्या कार्यपद्धतीची रचना झाली आहे.

         परिवार के लिए अपने आराम को त्याग देना यह एक ऐसी अवस्था है, जिसे बहुत से मनुष्य प्राप्त कर चुके है, स्री के सन्मान या घरकी सुरक्षा के लिये अपने जीवन का उत्सर्ग कर देना, एक उच्चतर प्रकृति का कार्य है, जिस में मनुष्य व्यष्टी रूप में तथा विशेष वर्गों के रूप में भी समर्थ होता है; परंतु समष्टी रूप में नहीं | परिवार के बाद समाज या संघ आता है और इस प्रकार आत्मा के विस्तार में अगला कदम तब उठाया जाता है, जब शरीरस्थ आत्मा और परिवारनिष्ठ आत्मा के साथ का तादात्म्य, समाजवर्ती या संघवर्ती आत्मा के तादात्म्य के सामने झुक जाता है | यह स्वीकार करना की मनुष्य पर अपने परिवार के अपेक्षा अपने संघ का बडा दावा है, सामाजिक अवस्था की और प्रगती की सबसे पहली शर्त है |                                                              योगीराज अरविंद

        भंगलेले, श्रद्धाहीन, अव्यवस्थित व असंघटित समाजजीवनच आमच्या पारतंत्र्याचे व सर्वदूर झालेल्या दुर्दशेचे मूलभूत कारण आहे. या सर्व दोषांचे निर्मूलन करणे हे आपले परम कर्तव्य आहे.                प. पू.  श्रीगुरुजी

         प्रत्येक समाजाने आपल्या संरक्षणाची व्यवस्था आपणच करावयास हवी हे खरे असले तरी आपण हिंदू समाजाच्या संघटना विषयी बोलतो. त्याचा अर्थ फक्त संरक्षणापुरताच नाही. आपल्यामध्ये गेल्या हजार वर्षांत स्पृश्यास्पृश्य, श्रेष्ठकनिष्ठ, जात आणि वर्णावर आधारित द्वेष, तऱ्हेतऱ्हेच्या निंद्य चालिरीती,  अंधश्रद्धा आणि सामाजिक व आर्थिक बहिष्कार अशा वाईट गोष्टी शिरल्या आहेत. त्या सर्व गोष्टी दूर करून आपले समाज जीवन पुन्हा स्वच्छ व शांततापूर्ण बनवायचे, अन् राष्ट्रजीवन निरोगी व निर्भय बनवायचे हेच आपले ध्येय आहे.

        ज्यांतील सर्वसामान्य माणूस समाजाभिमुख तसेच सहजगत्या सामर्थ्यवान बनून स्वेच्छेने आपल्या समाजाचे पोषण सतत करीत राहील असे समाजजीवन निर्माण करण्याची संघाची कल्पना आहे. या कार्यात किती पिढ्या जातील यावर विचार करणे हा आमचा विषय नाही. आपल्याला तर सतत कार्य करीत रहायचे आहे. अन्य योजना पूरक आहेत. आपले कार्य मुख्य व आधारभूत आहे.

       आता आम्हाला आपल्या कार्यास सामाजिक बैठक देऊन समाजजीवनाच्या सर्व अंगोपांगांमध्ये जावे लागेल. म्हणून हे करताना वैयक्तिक वा कौटुंबिक अडचणी कितीही का येईनात, ही जबाबदारी उचलायचीच असा विचार आपण सर्व स्वयंसेवकांनी करावा.

      स्वहिताची चिंता करीत असतानाच समाज हिताचीही चिंता करणे ही स्वाभाविक अवस्था आहे. व्यक्तिचे हित व समाजाचे हित यात आम्ही कोठेही विरोध वा संघर्ष मानीत नाही. 
व्यक्तीशिवाय समाजाची कल्पना अशक्य आहे. आणि समाजाशिवाय व्यक्तीच्या जीवनाला काहीही मूल्य उरत नाही. म्हणून आम्ही या दोन्हीही घटकांमध्ये समन्वय साधू इच्छितो. 
व्यक्तीच्या विकासाची व समाजाच्या पूर्णतेची ही समन्वयात्मक विचार पद्धती म्हणजे भारताने जगाला दिलेली एक देणगीच होय.

       संपूर्ण व सुदृढ हिंदुसमाज हेच आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असले पाहिजे. जात, भाषा, पंथ किंवा पक्ष यासारख्या अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार या अनन्य समाज भक्तीच्या आड येता कामा नये. हिंदू समाजरूपी जागृत देवतेची भक्ती करताना आपण आपल्या मनातील सर्व फुटीर प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून आपल्या आंतरिक एकतेचा जीवनदायी संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सिद्ध होऊ या. आणि प्रत्येक हिंदू अंतरकरणांमध्ये जीवमान समाजदेवतेची तिच्या अनेकविध गौरवसंपन्न अविष्कारांनी तळपणारी तेजस्वी मूर्ती प्रस्थापित करूया.

१०
        संस्कृती व्यक्ती और समष्टि दोनों से संबंध रखती है, यद्यपि संस्कृति का भाव मूलतः समष्टिगत होता है | संस्कृति के माध्यम से जीवन के वैशिष्ट्य अर्थात् समाज की आत्मा की अभिव्यक्ती होती है | यह सत्य है कि जिस प्रकार ब्रह्म संपूर्ण सृष्टी के बाद भी दस अंगुल बचा रहता है, उसी प्रकार अनेक व्यक्तींयोंसे मिलकर बना होने के बाद भी समाज का अपना एक अलग अस्तित्व और वैशिष्ट्य होता है | इसके साथ यह भी उतना ही सत्य है कि जब समाज क्रियाशील होना चाहता है, तो उसे अपनी भावनाओंके प्रगटीकरण के लिए व्यक्तियों के पुरुषार्थ का ही सहारा लेना पडता है | समाज व्यक्तीयों के बिना काम नही कर सकता अंत:  संस्कृति मूलत: समाष्टिगत होते हुए भी उसका संबंध व्यक्ती हे  आये बिना नहीं रहता |                                               पं. दीनदयाळ उपाध्याय

११
           व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंधांचा आमचा दृष्टिकोन कधीही संघर्षाचा नव्हता, तर सर्व व्यक्तींमध्ये एक सत्य विराजमान आहे, या अनुभूतीतून निर्माण झालेल्या सामंजस्याचा आणि सहयोगाचा आहे. व्यक्ती आणि समाज एकमेकांना पूरक आहेत. परिणामतः दोघांनाही एकमेकांपासून शक्ती प्राप्त होऊन परस्परांचा लाभ होतो.

१२
          भाकरी जीवनासाठी आवश्यक आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की भाकरी खाणारे मरतच नाहीत. ' भाकरी खाणारे एक ना एक दिवस मरतातच म्हणून मी भाकरी खाणार नाही 'असा विचार करून जर कोणी उपवास करून लागेल तर त्याचा परिणाम काय बरे होईल ? निष्कर्ष हा कि भाकरी खाऊनही मृत्यूपासून सुटका नाही आणि भाकरी न खाऊ नही अमरता मिळत नाही. जिवंत राहण्यासाठी भाकरी खाणे आवश्यक आहे, परंतु अमर होण्यासाठी शरीराकडून सत्कार्य होणे आवश्यक आहे. व्यक्तीचे शरीर राखण्यासाठी पूजन आवश्यक असते परंतु व्यक्तीला अमर होण्यासाठी समष्टीचा आधार घेणे आवश्यक असते.                                 पं. दीनदयाळ उपाध्याय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा