बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२९

                     विवेकानंद अमृत २२९

     आपले तत्वज्ञान सांगते की, वाईट आणि चांगले हे सदैव परस्परांशी निगडीत असते . एक असले की दुसरे आहेच . त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . समुद्रात एका ठिकाणी लाट निर्माण होते तेव्हा दुसरीकडे पाणी खोल जाते . नव्हे, सारे जीवनच तसे दुरिताने भरलेले आहे . कित्येक जीवजंतूंना मारल्याशिवाय साधा श्वास सुद्धा घेणे शक्य नाही . कोणाकडून तरी हिरावून घेतल्याशिवाय अन्नाचा एक घास खाणे शक्य नाही . जीवनाचा हाच नियम आहे . हेच तत्वज्ञान आहे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा