सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३४

                       विवेकानंद अमृत २३४

     एक भव्य सुंदर वास्तू  , गतकालीन वैभवाचा अवशेष आजही आपल्याकडे टिकून आहे . ही वास्तू दुर्लक्ष केल्याने, वावर नसल्याने पडीक होऊन राहिली आहे . भग्न झाली आहे . तिथे धूळ-कचऱ्याची पुटे जमली आहेत . काही पडझड झाली आहे . या वास्तूचे तुम्ही काय कराल ? आवश्यक ती स्वच्छता कराल,डागडुजी कराल आणि ती पूर्ववत उभी कराल की, जी आहे तीही मातीला मिळवून तिच्या जागी जिच्या पक्केपणाची काही शाश्वती देत येत नाही अशी नवी वास्तू बांधाल ? आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे . पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा