सोमवार, २ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१२

                      विवेकानंद अमृत २१२

     जेव्हा पाश्चात्य देशात शिक्षण आणि संस्कृती ही पांढरपेशा उच्चभ्रुपुरती मर्यादित न राहता समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचे खरे आधुनिकीकरण झाले . आणि तिथपासूनच त्यांच्यात आणि हिंदुस्थान, इजिप्त, रोम यांच्या प्राचीन संस्कृतीत झपाट्याने अंतर पडत गेले . मी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, शिक्षण आणि विचार यांचे अभिसरण एखाद्या देशातल्या बहुजन समाजात जसजसे होत जाईल तसतसे त्या देशाचे रूप पालटू लागते . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा