शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३८

                       विवेकानंद अमृत २३८

     जगातील श्रेष्ठ प्रेषित नेहमी असे म्हणत आले आहेत की, मी जगाच्या विनाशासाठी आलेलो नाही तर ते अधिक परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे . हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे . पुष्कळदा ही गोष्ट लक्षात न आल्याने त्यांची क्षमाशीलता ही तत्कालीन लोकप्रिय मतांशी केलेली अयोग्य तडजोड आहे अशी समजूत होऊ शकते . आजही आपण ऐकतो की, प्रेषित हे भित्रे होते आणि त्यांना जे म्हणायचे होते ते ते स्पष्टपणे म्हणू शकले नाहीत . पण हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा