मंगळवार, ३० जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७९

                         विवेकानंद अमृत १७९ 

     आता अन्य देवदेवतांना मनात स्थानच नको . आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र . त्याचीच आराधना करा . ते जागृत आहे . सर्वत्र त्याचेच चरण, त्याचेच हात, त्याचेच श्रवण . तो सर्वव्यापी आहे . बाकी सर्व दैवते झोपली आहेत . त्या विराटाचे दर्शन सर्वत्र होत असताना अन्य देवतांची ही व्यर्थ आराधना कशाला ? या एकमेव उपास्य दैवताची उपासना आपल्या हातून घडू दे . त्यातच इतर दैवतांची उपासना आपोआप घडेल . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा