शनिवार, १३ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६१

                     विवेकानंद अमृत १६१ 

     आपण बाहेर गेले पाहिजे . अध्यात्मज्ञानातील रहस्ये सांगून भौतिकज्ञानाची रहस्ये जाणून घेतली पाहिजेत . आपण सदैव विद्यार्थीभावाने जाणार नाही, शिक्षकाच्या भूमिकेतूनही आपल्याला जावे लागेल . समानतेशिवाय मित्रत्व शक्य नाही . आणि जेव्हा एक बाजू सदैव दात्याच्या भूमिकेत असते . तिथे समानता-मित्रत्व शक्य नाही कारण दुसऱ्या पक्षाला नेहमी पहिल्याच्या पायाशीच बसावे लागते ! शिकता शिकता शिकवूनच आपल्याला पाश्चात्यांची बरोबरी करता येईल . अजून शेकडो वर्षे जगाला देता येईल एवढा ज्ञानसंचय हिंदुस्थानाकडे आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा