रविवार, १४ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६२

                      विवेकानंद अमृत १६२ 

     प्रत्येक राष्ट्राला जिवंत राहण्यासाठी काही द्यावे लागते .काही घ्यावे लागते . चैतन्य दिल्याने मिळते . आपण इतरांकडून जेव्हा काही घेतो तेव्हा त्यांना काही देणे हे आपले कर्तव्यच असते . ज्या अर्थी आपण सहस्रो वर्षे जिवंत आहोत त्या अर्थी सहस्रो वर्षे आपण सतत देत आलो आहोत हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे . अज्ञानी लोक काही का समजेनात ! धर्म आणि तत्वज्ञान, ज्ञान आणि अध्यात्म यांचे अमोल देणे हिंदुस्थान जगाला देत आला आहे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा