रविवार, ९ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२७

                        विवेकानंद अमृत १२७ 

     गेल्या हजार वर्षात दौर्बल्य वाढविणाऱ्याच गोष्टी आपण करत आलो आहोत . इतक्या प्रमाणात की, जमिनीवरून सरपटत जाणाऱ्या गांडूळाची दशा आपल्याला आली आहे ; कोणीही यावे आणि आपल्याला पायाखाली चिरडावे !
     म्हणून माझ्या मित्रांनो, तुमच्या रक्ताचा भाऊ या नात्याने, तुमच्याशी ज्याच्या जीवन-मरणाची गाठ बांधली आहे असा एक आप्त म्हणून मी तुम्हाला सांगतो कि, आपण शक्तीची उपासना केली पाहिजे . उपनिषदे म्हणजे सामर्थ्याचा अक्षयकोषच आहेत . सर्व विश्व गदगदा हलवील असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे . सारे विश्व त्यांच्या संदेशाने चैतन्यमय होईल, सामार्थ्यमय होईल . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा