शनिवार, १ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२०

                        विवेकानंद अमृत १२० 

     खरोखर अशी आत्मश्रद्धा निर्माण होणे अत्यंत हितकारक आहे . ही आत्मश्रद्धा दृढ करण्याचे शिक्षण जर आपल्याकडे दिले गेले असते आणि त्यानुसार जर आपल्या समाजात आचरण घडले गेले असते, तर आपल्यातील अनेक दोष आणि दुर्गुण, आपल्या वाट्याला आलेले दैन्य, हे भस्मसात झाले असते . इतिहासाची पाने उलगडून पहा . सर्व श्रेष्ठ स्त्रीपुरुषांच्यात जर कोणती बलवत्तर प्रेरणा आढळून येत असेल तर ती स्वतःच्या सामर्थ्याविषयींच्या परिपूर्ण विश्वासाची ! ' आपण मोठे होणार आहोत ' या विश्वासाने ते जगले आणि खरोखर महान झाले .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा