सोमवार, २४ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४३

                        विवेकानंद अमृत १४३ 

     हिंदुस्थानचे प्रश्न इतर कोणत्याही देशापेक्षा फार गुंतागुंतीचे, व्यापक आहेत . वंश, धर्म, भाषा आणि शासन यांनी मिळून राष्ट्र घडते . आपल्याला एकमेव अधिष्ठान आहे ते आपल्या पवित्र परंपरेचे, आपल्या धर्माचे . त्यावरच या राष्ट्राची पुन्हा उभारणी करायची आहे . 
     आपल्याकडे धर्मावर आधारलेली ऐक्यभावना अत्यंत आवश्यक आहे . संपूर्ण देशाला एकच धर्मचैतन्य व्यापून असले पाहिजे . मात्र ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध यांच्यातील एक-धर्माची कल्पना मला येथे अभिप्रेत नाही . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा