शुक्रवार, ७ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२५

                     विवेकानंद अमृत १२५ 

     वेदांवर अधिकारवाणीने भाष्य केवळ एकानेच केले , तो म्हणजे वेद ही ज्याची सहजस्फुरणे आहेत असा भगवान श्रीकृष्ण . गीतेत त्याने सांगितले ते सर्व वर्णांसाठी, सर्व व्यावसायिकांसाठी आहे . ' धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम '  हे काही खरे नाही . चैतन्याने स्फुरणारी ती तत्वे गुहेतून बाहेर आलीच पाहिजेत . न्यायालयांमध्ये, विद्यालयांमध्ये त्यांचा संचार झाला पाहिजे . गरिबांच्या झोपड्यांमधून, मासे पकडणाऱ्या कोळ्यांच्या खोपटामधून ती निनादली पाहिजेत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा