शनिवार, २९ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४७

                         विवेकानंद अमृत १४७ 

     आम्ही पोपटपंची तर खूपच करतो, पण काम काहीच करत नाही ! बोल बोल बोलायचे आणि कृतीशून्य असायचे, हे जणू आमच्या अंगवळणीवच पडून गेले आहे . याचे कारण काय ? शारीरिक दौर्बल्य हेच याचे कारण. क्षीण मेंदूला भव्य कल्पना सुचणे कसे शक्य आहे ? तो सामर्थ्यवान झालाच पाहिजे !
     आज जर खरे काही हवे असेल तर ते रक्तातील उसळते चैतन्य, लोखंडाचे बाहू आणि पोलादाच्या नसा ! मन मिळमिळीत करणाऱ्या स्वप्नाळू कल्पनांचा पहिल्यादा त्याग करा . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा