शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८३

                      विवेकानंद अमृत ८३

     कुठल्यातरी ऐतिहासिक कथेभोवती आपल्या प्रत्येक पुरणाची गुंफण झाली आहे . पुराणांचा हेतू हा की, उदात्त सत्यांचे विविध रूपांत मानवांना दर्शन घडवावे . त्यांच्यात ऐतिहासिक वास्तवाचा अंश असेल किंवा नसेलही . पण फार श्रेष्ठ अशा सत्याचा अविष्कार त्यांच्यात झाला आहे हे निर्विवाद . रामायणचेच उदाहरण घ्या . राम प्रत्यक्ष होऊन गेला की नाही हे महत्वाचे नाही . चारित्र्याचे जे उत्तुंग आदर्श रामायणाने निर्माण केले ते महत्वाचे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा