शनिवार, २० एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७६

              विवेकानंद अमृत ७६ 

     एक श्रेष्ठ प्रेषित उत्तरेत जन्मला . तो म्हणजे सिक्खांचे गुरु गोविंदसिंह ! त्यांच्याजवळ कल्पक प्रतिभा होती .आपल्या तपोबलाने ते सिक्खांची मजबूत संघटना आपल्या पाठीशी उभी करू शकले . भारताच्या इतिहासात हे पुनः-पुन्हा आपण पहिले आहे की, धर्मजागरणाच्या पाठोपाठ ऐहिक वैभव येते . राजकीय ऐक्य घडते . आणि देशाच्या विराट भागाचे राजकीय ऐक्य हे पुनश्च आध्यात्मिक प्रेरणा बलशाली करते .      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा