सोमवार, १५ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७२

            विवेकानंद अमृत ७२

     महंमद आणि इतर काही धर्मनेत्यांची चरित्रे वाचली की , हा धोका जाणवतो . तरीही त्या सर्वांमध्ये काही स्फुरण होते असेही दिसते . आपले भावविश्व संपन्न करीत एखादा प्रेषित जेव्हा भावावस्थेत जातो तेव्हा तो केवळ काही सत्ये प्राप्त करतो असे नव्हे तर काही भ्रम, धर्मपिसाटपणाही त्याच्या ठायी निर्माण होतो. अशा धर्मपिसाटपणामुळे जगाचे फार मोठे नुकसान झाले आहे . मनुष्य जीवनातील विसंगती पाहिल्यावर कळते की, मन हे बुद्धीच्या पलीकडे गेले पाहिजे - पण ते शास्त्रीय पद्धतीने, सावकाश, साधना करीत गेले पाहिजे . आणि सर्व भ्रम टाकून देऊन शुद्ध ज्ञानच हृदयात प्रकाशित झाले पाहिजे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा