मंगळवार, १९ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४५

                          विवेकानंद अमृत ४५ 

    महाबली हनुमान हा तुमचा आदर्श असला पाहिजे . श्रीरामचंद्राची आज्ञा होताच त्याने सागर पार केला ! त्याला जीविताची लेशमात्र तरी चिंता होती काय ? ' जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठं ' असे त्याचे वर्णन करतात . त्याने पूर्ण इंद्रियजय केला होता आणि तो विलक्षण प्रज्ञावंत होता . स्वामिसेवेचा  हा आदर्श तुम्ही स्वतःपुढे ठेवला पाहिजे . मग त्यातूनच जीवनातील इतर आदर्शांचा आविष्कार होईल . गुरूच्या आज्ञेचे निःशंक पालन आणि कठोर ब्रह्मचर्याचे आचरण हेच यशस्वितेचे रहस्य आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा