मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९३

                         विवेकानंद अमृत १९३ 

     मी असे ऐकले आहे की, जपानी मुलींची अशी समजूत असते की, आपल्या बाहुल्यांवर खूप जीवापासून प्रेम केले तर त्या जिवंत होतात . म्हणून जपानी मुलगी आपल्या बाहुलीला जीवापाड जपते . माझीही अशी श्रद्धा आहे की भुकेकंगाल, निर्धन, अविवेकी, पतित, भांडखोर आणि मत्सरी अशा या समाजावर जर का कोणी सर्वांतःकरणपूर्वक प्रेम करतील तर हा समाज जागृत होईल . विशाल अंतःकरणाचे शतावधी स्त्री-पुरुष जर सर्व जीवनभोगांचा त्याग करून त्यांच्या सर्व शक्ती आपल्या लक्षावधी देशबांधवांच्या कल्याणार्थ समर्पण करतील तर अवनती आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात खोल खोल जात चाललेला हा समाज खात्रीने वर येईल .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा