बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०१

                       विवेकानंद अमृत २०१

     तुमच्याजवळ भाव आहे का ? बुद्धी आणि तर्क यांत काय आहे ? -- त्यांची धाव फार मर्यादित आहे . पण हृदयात मात्र स्फूर्तीचा उचंबळता झरा आहे . म्हणून हृदयाला सर्वाधिक महत्व आहे . देव भावाने भेटतो, बुद्धीने नाही ! बुद्धी फार तर आपल्यापुढचा मार्ग मोकळा करते . तिचे कार्य पोलीसासारखे आहे . पण पोलिस हे काही समाजाचे अनिवार्य अंग नव्हे . पोलिस गुन्हा करू देणार नाही, गोंधळ माजू देणार नाही . बुद्धीचेही काम एवढेच आहे . बुद्धीला डोळे नाहीत . हात आणि पायही नाहीत . ती स्वतःहून काहीच करू शकत नाही . भावना ही खरोखर चैतन्यमयी आहे . भावना विजेहून अधिक वेगाने काम करते . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा