रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९७

                         विवेकानंद अमृत १९७

     विपन्नता आणि अज्ञान यांच्या गर्तेत पिचणाऱ्या आपल्या लक्षावधी बांधवांसाठी कोणाचे काळीज तुटते काय ? आपणही माणसे आहोत हेच ते विसरले आहेत व परिणामतः गुलामीचे जिणे जगताहेत . जाणते लोक हे सारे पाहताहेत, पण त्याचे खापर त्यांनी हिंदूधर्माच्याच माथी मारले आहे . आणि या विपन्न बांधवांना सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धर्मावर कुऱ्हाड घालणे असे ते समजतात .   
     कृपा करून मी काय म्हणतो ते ऐका . परमेश्वर कृपेने मी यातले रहस्य शोधून काढले आहे . हा दोष धर्माचा नव्हेच नव्हे . याच्यावर कसले खापर फोडू नका . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा