सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८५

                      विवेकानंद अमृत १८५ 

     ज्याचा स्वतःवरच विश्वास नाही तो नास्तिक होय . ते  सुंदर कठोपनिषद तुम्ही वाचले आहे का ? एका राजाने एकदा एक मोठा यज्ञ सुरु केला . यज्ञात खरे म्हणजे सर्वोत्तम वस्तूंचे दान करायचे असते . पण या राजाने वांझ गायी आणि निरुपयोगी घोडे यांचे दान करायला सुरुवात केली . हे पाहून नचिकेताच्या मनात श्रद्धेचा उदय झाला . श्रद्धा हा शब्द नीट समजून घेतला पाहिजे . हा एक अद्भुत शब्द आहे . नचिकेताच्या मनात श्रद्धेचा उदेजल्याबरोबर काय झाले ? तो स्वतःशीच म्हणाला,


बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यमः |
किं स्विद्यमस्य कर्तव्यं यन्मया द्य करिष्यति ||  

     मी कितीकांहून श्रेष्ठ आहे . काही थोडे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे खरे, पण मी अगदीच काही शेवटचा नाही . मी खात्रीने काही करू शकतो .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा