रविवार, ११ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९१

                         विवेकानंद अमृत १९१ 

     केवळ पोकळ गप्पांमध्ये शक्तीचा अपव्यय करण्याऐवजी तुम्ही एखादा प्रत्यक्ष उपाय शोधून काढला आहे काय ? हे लोक जिवंतपणी ज्या यमयातना भोगीत आहेत त्या हलक्या करण्यासाठी सांत्वनाचे चार गोड शब्द तुम्ही त्यांच्याशी बोलला काय ? की केवळ टीकाच करता ? 
     जर तुम्ही मधुर शब्द बोलत असाल तर ती दुसरी पायरी झाली . आणखी एक गोष्ट आवश्यक आहे . हे सारे तुम्ही का करता ? पैसा, कीर्ती किवा सत्ता यांच्या लालसेपोटी हे कर्म नाही याविषयी तुमची खात्री आहे ना ? आपला हेतू शुद्धच पाहिजे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा