शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९०

                           विवेकानंद अमृत १९० 

     जाणते लोक निंदा करोत वा वाखाणोत; लक्ष्मी घरी स्थिर राहो वा अन्यत्र जावो; मृत्यू आज येवो वा अनेक युगांनी येवो - धैर्यवान पुरुष सत्यमार्गावरून तिळमात्र ढळत नाहीत . असा कणखरपणा तुमच्या ठायी आहे ? 
     एवढ्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्या तर तुमच्यापैकी प्रत्येकजण अद्भुत कार्य करू शकेल . वृत्तपत्रात मोठमोठे लेख लिहिणे, लांब - लांब व्याख्याने देणे याची काय आवश्यकता ? तुमचे भावच तुमच्या मुद्रेवर विलसू लागतील . तुम्ही गुहेत राहत असाल तर पाषाणशिलांना भेदून तुमचे विचार जगभर पोहोचतील . शतकानुशतके घुमत राहतील . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा