गुरुवार, ३० मे, २०१३

विवेकानंद अमृत ११७

                    विवेकानंद अमृत ११७ 

     पाश्चात्य आणि आपण यांच्यात असलेला महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत आहे आणि आपल्यात नाही संस्कृती आणि शिक्षण हे पाश्चात्य देशांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचले आहे; आपल्याकडे पोहोचलेले नाही . हिंदुस्थानातील आणि अमेरिकेतील उच्चवर्णीयांच्यात फारसा फरक नाही . पण या दोन देशांतल्या बहुजन समाजांमध्ये भयानक मोठी दरी आहे . ब्रिटिशांना हिंदुस्थान जिंकणे इतके सहज का शक्य झाले ? कारण त्यांच्यातील राष्ट्रभावना जागृत आहे आणि आपल्यातली नाही .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा