विवेकानंद अमृत ११४
आज आपल्याला जे शिक्षण मिळते त्यात काही थोड्या चांगल्या गोष्टी आहेत हे खरे . पण त्यात घातक गोष्टी एवढ्या आहेत कि, त्या चांगल्या गोष्टी कुठल्याकुठे विरून जातात . हे काही मनुष्य-घडणीचे शिक्षण नव्हे . उलट हे मनुष्यत्व खच्ची करणारे शिक्षण आहे ! ते मृत्यूहून भयानक आहे ! मूल पहिल्या दिवशी शाळेत जाते आणि काय शिकते ? - तर त्याचा बाप मूर्ख होता, त्याचा आजा भ्रमिष्ट होता आणि त्याचे गुरु दांभिक आहेत . त्याचे धर्मग्रंथ हे असत्याने ठासून भरलेले आहेत .! असे मूल तारुण्यात प्रवेश करते तेव्हा खच्ची करणाऱ्या कल्पना, कणाहीन विचार आणि प्रेरणाशून्यता यांचे ते बेंगरूळ गाठोडे होते !
आज आपल्याला जे शिक्षण मिळते त्यात काही थोड्या चांगल्या गोष्टी आहेत हे खरे . पण त्यात घातक गोष्टी एवढ्या आहेत कि, त्या चांगल्या गोष्टी कुठल्याकुठे विरून जातात . हे काही मनुष्य-घडणीचे शिक्षण नव्हे . उलट हे मनुष्यत्व खच्ची करणारे शिक्षण आहे ! ते मृत्यूहून भयानक आहे ! मूल पहिल्या दिवशी शाळेत जाते आणि काय शिकते ? - तर त्याचा बाप मूर्ख होता, त्याचा आजा भ्रमिष्ट होता आणि त्याचे गुरु दांभिक आहेत . त्याचे धर्मग्रंथ हे असत्याने ठासून भरलेले आहेत .! असे मूल तारुण्यात प्रवेश करते तेव्हा खच्ची करणाऱ्या कल्पना, कणाहीन विचार आणि प्रेरणाशून्यता यांचे ते बेंगरूळ गाठोडे होते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा