मंगळवार, २८ मे, २०१३

विवेकानंद अमृत ११२

                          विवेकानंद अमृत ११२ 

     शिक्षण म्हणजे अपरिपक्व आणि गोंधळ उडवून देणाऱ्या कल्पनांचे आणि माहितीचे गाठोडे जन्मभर गोळा करणे नव्हे. चैतन्याने मुसमुसलेले, चारित्र्य घडविणारे, पुरुषार्थ प्रदान करणारे ते शिक्षण ! शेकडो ग्रंथ डोक्यात कोंबण्यापेक्षा तुम्ही अगदी थोड्या कल्पना खरोखर आत्मसात केल्यात आणि त्या जगून दाखविल्यात तर ते खरे शिक्षण . म्हणून या देशातील अध्यात्मिक आणि लौकिक शिक्षण आपल्याच हातात असले पाहिजे . राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती त्या शिक्षणातून झाली पाहिजे . त्यासाठी अनुरूप ती साधने आपण स्वतः घडवली पाहिजेत .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा