बुधवार, २२ जून, २०१६

१४ . लोकशाही

                           १४ . लोकशाही 
        लोकशाही हे लोकासंबंधीचे कर्तव्य पार पाडण्याचे केवळ एक साधन आहे . साधनाची प्रभाव क्षमता, लोकजीवनात राष्ट्राबद्धल आत्मियता, आपल्या जबाबदारीची जाणीव आणि शिस्त यावर अवलंबून आहे . 

         इस देश में सभी को नागरिकता के समान अधिकार हैं | तो सबके लिये समान कानून भी होना चाहिये | हम लोग जब इसकी आवश्यकता प्रतिपादित करते हैं, तो हमें सांप्रदायिक कहा जाता है | और जो संप्रदाय का विचार कर अपनी नीतियां बनाते है, वे राष्ट्रीय कहलाते हैं | जम्मू-काश्मीर के लिए बनी हुई 370 धारा समाप्त कर अन्य राज्यों के समान व राज्य भी होना चाहिये, ऐसी मांग हम करते हैं तो हम सांप्रदायिक बन जाते है और संप्रदाय विशेष की वहां पर बहुसंख्या होने के कारण वहां 370 धारा के तहत अलगाववाद  का पोषण करने वाले राष्ट्रीय कहलाते हैं | विपरीत सोच का ऐसा उदाहरण अपने देश के बाहर कहीं तो भी मिलेगा क्या ?                                    बाळासाहेब देवरस


१३ . कार्यकर्ता

                                        १३ कार्यकर्ता 

     कोणताही समाज सामर्थ्य संपन्न व्हावा व ते सामर्थ्य कायम रहावे यासाठी समाजात समाजहितदक्ष, प्रामाणिक, समाजासाठी कोणतेही कार्य करण्याची तयारी असलेले सदैव तत्पर, कर्तव्यदक्ष आणि त्यागी कार्यकर्त्यांची उज्ज्वल परंपरा निर्माण होण्याची आवश्यकता आहे . आणि ही परिस्थिती चिरकाल राहावी याकरिता अशी मूलगामी परिस्थिती निर्माण करणारा निरपेक्ष पवित्र स्त्रोत निर्माण करण्याचे कार्य संघाने स्वीकारले आहे . 
                                                                                                             - भय्याजी दाणी
           कार्यकर्ता म्हटला कि तो एक आकर्षण-केंद्रच बनला पाहिजे. पाच पन्नास लोकांना आपल्याकडे ओढून ठेवण्याची कुशलता त्याच्याठायी असली पाहिजे. एखादातरी गुण त्याच्या अंगी भरपूर प्रमाणात असला पाहिजे. ज्याच्या वाणीतून अमृत वाहत असेल, ज्याला देशकाल परिस्थितीचे उत्तम आकलन असेल, कोणाला कोणते काम सांगावे हे ओळखण्याची व ते काम त्याच्याकडून करवून घेण्याची कुशलता ज्याच्याजवळ असेल तोच संघटना निर्माण करू शकेल.                                                        
                                                                                                                  - पू . श्रीगुरुजी 

१५. शासन- सरकार

                            १५. शासन- सरकार 

     हे हिंदुराष्ट्र सनातन आहे . पूर्वी होते, आजही आहे आणि पुढेही राहील . आम्हाला जर अशी स्थिती हवी असेल तर हे राष्ट्र व त्याचे समाजजीवन शासन निरपेक्ष व स्वायत्त म्हणजे स्वयंशासित असले पाहिजे . त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणजे शासन . यापेक्षा त्याचे अधिक महत्व नाही .
  
         आपल्याकडे समाजजीवनाचा आधार धर्म होता, राज्य नव्हे. समाजाची धारणा धर्माच्या आधाराने होते, शासनाच्या आधाराने नव्हे. हे हिंदूंचे वैशिष्ट्य होते. शासन हे धर्माच्या निरनिराळ्या साधनांपैकी एक असू शकते. म्हणूनच त्याच्या आधारावर समाजाची धारणा होऊ शकणार नाही. 

        ज्या राष्ट्रात सरकार किंवा राज्यसत्ता सर्वशक्तिमान मानली जाते आणि प्रत्येक कामासाठी सरकारच्या, सत्तेच्या तोंडाकडे पाहिले जाते त्या राष्ट्राच्या नशिबी गुलामी येणे स्वाभाविक असते. सत्तेसमोर लाचार व परावलंबी राहता राहता लोकशाही क्षीण होत जाते. याचे उत्तम उदाहरण सोव्हिएट रशियाच्या रूपाने पहावयास मिळते. तेथे गेली साठ वर्षे सरकार आणि पक्ष यांच्या हातात सर्वाधिक शक्ती देऊन प्रजेला केवळ आश्रित बनविले गेले. परिणामतः तेथील व्यक्तीस्वातंत्र्य पूर्णतः नष्ट झाले. तेथील समाज जणू गुलाम बनला आहे. परंतु जेथे जनशक्ती जागृत असते तेथे सरकार किंवा शासन-सत्तेची मनमानी चालत नाही. तेथील सत्तेवर अंकुश लावला जाऊ शकतो.

११ अखंड भारत

                               ११  अखंड भारत 

     मातृभूमीवरील उत्कट, सक्रिय निरपवाद आणि ज्वलंत निष्ठा हा स्वतंत्र विकासोन्मुख व गौरवसंपन्न राष्ट्रजीवनाचा प्राण आहे . आपण हिंदू तर मातृभूमीवरील अत्यंत उदात्त व दैवी प्रेमाचे वारस आहोत . प्रत्येक हिंदुच्या अतःकरणातील तो प्राचीन परंतु आज सुप्त असलेला स्फुल्लिंग प्रज्वलित होऊ दे . त्या सर्व ज्वाला एकत्र होऊन एक प्रचंड यज्ञकुंड रसरसू दे . मातृभूमीवर आजवर झालेली सर्व आक्रमणे, तिचे झालेले अपमान त्या यज्ञीय ज्वालेत जळून खाक होतील आणि भारतमातेला तिच्या मूळच्या अखंड स्वरुपात सुप्रतिष्ठित करण्याचे आपले स्वप्न साकार झालेले दिसेल .                                                                                                        - श्रीगुरुजी 

                                आज आपल्याला प्रत्येक मनुष्याच्या  अंतःकरणात अशी अनुभूती निर्माण करावयाची आहे कि
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भिन्न भिन्न विचारप्रवाह , संप्रदायपंथोपपंथजाती उपजाती आणि विविध भाषाभाषी असे आपण सर्व मिळून हा एक अखंड समाज आहेआपले हे अखंड राष्ट्र आहे  आपले सर्वांचे मिळून एकरस राष्ट्रजीवन आहे .

३ 
         कोणत्या पापाचे फळ म्हणून देशाचे तुकडे पाडण्याची ही शिक्षा आपणाला मिळाली आहे ? आपल्या राष्ट्रजीवनाला न ओळखता मातृभूमीऐवजी दुसऱ्या कशाची पूजा करण्याच्या महापापांचे हे फळ आहे. आपण आपली संस्कृती आणि आपल्या जीवनाचा आत्मा असलेली भारतीयता ठोकरून लावली त्यातून हे विषारी फळ आपल्याला मिळाले. इतिहासामधील घटनांवरून समाजजीवनाची परीक्षा होते. आपल्या सामाजिक चैतन्याचा सतत तेजोभंग केल्यामुळे आपल्याला हा दुर्दैवी दिवस पहावा लागला. आजची ही स्थिती आपल्या विजयाची नसून पराजयाची आहे.

४  
        भारताचे भाग्य धोक्यात येईल व धुळीसही मिळेल हे अशुभ घडता कामा नये. भारताची फाळणी नाहीशी केली पाहिजे. आपण अशी आशा करूया की, भारताची फाळणी नैसर्गिकरीत्या नाहीशी होईल. केवळ शांतता व समन्वयच नव्हे तर समान कृतीची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर जाणवून एकत्र व एकच काम करण्याच्या सरावाने व त्यासाठी उत्पन्न करण्यात येणाऱ्या साधनाने ही फाळणी दूर होईल.
                                                                               -योगी अरविंद

          भारताचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला गेला ती एक महाभयंकर चुकीची व महाभयंकर परिणाम करणारी गोष्ट होती हे अगदी निर्विवादच. हे विभाजन राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक, भावनिक आणि सामाजिक अशा सर्वच दृष्ट्या चूक होते. विभाजनामुळेच देशाचे विभिन्न तुकडे होऊन जे वेगवेगळे देश निर्माण झाले, त्यांचे भवितव्य एकमेकांवर अवलंबून आहे.  आजच्या खंडित भारतास आणि त्यांच्या झालेल्या तुकड्यांना शक्तिशाली करावयाचे असेल तर हे विभाजनच समाप्त करावे लागेल. आणि असेच होणारही आहे कारण विभाजन करणे हे निसर्गाच्या विरुद्धच आहे. 
                                                                                             - पू. बाळासाहेब देवरस


१७ . हिंदू धर्म


                                                                      १७ . हिंदू धर्म

      
             हिंदू धर्म म्हणजे न थांबणारा, अविश्रांत पुढे जाणारा सत्याचा शोध घेण्याचा मार्ग आहे . आज हा धर्म मरगळल्यासारखा वाटतो याचे कारण आपण थकलो आहोत, धर्म थकला नाही . ज्या क्षणी आपल्यातला हा थकवा नाहीसा होऊन, आपण उत्साहात काम करायला लागू त्या क्षणी हिंदू धर्माचा मोठा विस्फोट होईल आणि भूतकाळात कधीही नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात जगापुढे आपल्या प्रभावाने आणि प्रकाशाने तो चमकून उठेल . 
                                                                         -  महात्मा गांधी 
       धर्म किती का गूढ असेना, पण साधी गोष्ट अशी आहे कि, दुसऱ्याला पीडा देणे हा अधर्म आहे आणि आनंद देणे हा धर्म आहे. आपण आपापसात एकमेकांना अनुकूल बनणे हा धर्म आहे. धारणाशक्ती हे धर्माचे मूळ तत्व आहे. जो व्यवहार आपलेशी केला असता आपल्याला कष्टदायक वाटेल तो व्यवहार दुसऱ्याशी करू नका. वस्तुतः आत्मीयता हाच समष्टीमार्गाचा आधार आहे. संपूर्ण समाजाविषयी आपलेपणा निर्माण करणे, अहंभाव सोडून देऊन आत्मभाव जागविणे हाच खरा धर्म आहे. यानेच समाजाची धारणा होते. 
          जगांतील सर्व वादांचा ( वादांचा) अभ्यास करावा आणि आपल्या संस्कृती व परंपरा याचे चिंतन करावे.अभ्यास सर्व पद्धतींचा व्हावयास हवा. परंतु कोणाचे अंधानुकरण मात्र करणे आपल्या हिताचे नाही. प्राचीन काळापासून राष्ट्र रचनेचा आधार असलेला धर्म आमच्या गहन चिंतनाचा विषय होणे आवश्यक आहे.

४ 
          धर्माची पुनर्स्थापना होईल तेव्हाच हे राष्ट्र उभे राहील. समान परंपरा, समान परिश्रम,  समान भविष्यकाळ आणि समान आशा-आकांक्षा या सर्वांच्या आधारावर हे राष्ट्र पुनरपि उभे राहील.
                                                                                               - भगिनी निवेदिता 
     हिंदुधर्मः नैतिक जीवनं महत्वपूर्ण मन्यते | तथैव सर्वेषु वर्गेषु भ्रातृत्वं स्थापयितुम्  इच्छति | ये च नैतिक नियम धारितस्य मार्गस्य अनुसरणं स्वकर्तव्यं मन्यते | हिन्दुधर्मः कश्चन संप्रदायः न | प्रत्युत स कश्चन महान भ्रातृसंघः यश्च सत्यं मानयति सत्यान्वेषणं निष्ठापूर्वकं तत्परोभवति च |
                                                                                               -   डॉ . राधाकृष्णन 
     शत शत वर्षांच्या मोहनिद्रेनंतर आज आम्ही धर्माच्या सृजनात्मक युगात उभे आहोत. आम्ही आपल्या धर्माकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रारंभ केला आहे. आम्हाला हे जाणवते की आमचा समाज आज संतुलित अवस्थेत आहे. अनेक विकृती आणि विकारांनी ग्रासलेला आहे. आज हे सारे धुवून काढण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्माच्या शाश्वत आधारभूत सिद्धांतांना तिलांजली द्यावी अशी काळाची मागणी नसून उलट त्या सिद्धांताची उकल नव्याने मांडणे अत्यंत आवश्यक आहे. असे करणे म्हणजे काही नवा प्रयत्न आहे असे नव्हे तर हिंदू धर्माच्या इतिहासात कितीतरी वेळा केल्या गेलेल्या प्रयत्नांची ही केवळ पुनरावृत्ती असेल.  -                                                डॉ. राधाकृष्णन

    जे कोणी हिंदू संस्कृती आणि जीवनपद्धतीचा स्वीकार करतात ते सर्वच हिंदू आहेत. मग ते आस्तिक, नास्तिक, जडवादी किंवा संशयवादी कोणीही असोत. हिंदु धर्म जीवनाच्या आध्यात्मिक व नैतिक दृष्टीवर भर देतो; धार्मिक समजुतीवर नव्हे. या किंवा त्या धर्ममतावर श्रद्धा ठेवणारा म्हणून नव्हे, तर सत्कार्य करणाऱ्यास कधीच दुर्गती प्राप्त होत नाही. " न हि कल्याणकृत कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति | "                                                                                                    डॉ. राधाकृष्णन्
         हिंदू धर्म समन्वयवादी है | जिन लोगों ने हिंदू आचार, व्यवहार तथा जीवनदर्शन को स्वीकार कर लिया, हिंदू धर्म की ' एक सत् विप्रा: बहुधा वदन्ति ' की भावना को स्वीकार कर सहअस्तित्व के आधार पर हिंदू समाज की हित कामना में लग गये, वे सब हिंदू हो गये | सामाजिक लचक हिंदू धर्म की विशेषता रही है | सनातन धर्म माननेका अर्थ - स्थिर खडा हो जाना नहीं है, इसका अर्थ है, इसके महत्त्वपूर्ण सिद्धांतों को जान समझकर वर्तमान संदर्भ और देशकाल परिस्थितियो के अनुसार इन पर अमल करना |                                                            डॉ. राधाकृष्णन्

       हमारा अपना धर्म सब धर्मोसे अधिक संदेहवादी और सबसे अधिक विश्वासी है - सबसे अधिक संदेहवादी इसलिए की इसने सबसे अधिक प्रश्न उठाये हैं और परीक्षण किये हैं, सबसे अधिक विश्वासी इसलिए की इसके पास गंभीरतम अनुभूति तथा सबसे अधिक विविधतापूर्ण एवं भावात्मक अध्यात्मिक ज्ञान है | यह विशालतर हिंदू धर्म, जो कोई एक मतवाद या मतवादों का समुदाय नहीं है, बल्कि अतीत और भावी सामाजिक विकास की आत्मा है, जो किसी का निराकरण नहीं करता, परंतु प्रत्येक चीज को परखने और अजमाने के लिए आग्रह करता है और परख और आजमा चुकने के बाद से आत्मा के उपयोग में लाने का आग्रह करता है, उस हिंदू धर्म में हम भावी विश्व धर्म का आधार पाते हैं | इस सनातन धर्म के अनेक धर्मशास्त्र हैं - वेद, वेदांत, गीता, उपनिषद, दर्शन, पुराण, तंत्र और यह बायबल और कुरान से भी इन्कार नहीं करता | पर इसका वास्तविक सबसे अधिक प्रामाणिक धर्मशास्त्र तो उस हृदय में है, जिसमें सनातन देव का वास है |.                                               योगीराज अरविंद

१०
         हमने अपने सामने जो काम रखा है, वह यांत्रिक नहीं है, किंतु नैतिक और आध्यात्मिक है | हमारा लक्ष्य किसी एक प्रकार की सरकार को बदल डालना नही है, प्रत्युत एक राष्ट्र का निर्माण करना है | उस काम का राजनीति भी एक भाग है, परंतु एक भाग मात्र | हम अपनी सारी शक्ती राजनीती पर ही नहीं लगायेंगे | ना ही केवल सामाजिक प्रश्नों पर या ब्रह्मविद्या या दर्शन या साहित्य या विज्ञान के विषयों पर, परंतु इन सब को हम एकही वस्तु के अंतर्गत समझते हैं, जिसे हम सबसे आवश्यक मानते है | वह वस्तु है धर्म, राष्ट्रीय धर्म, जो हमारा विश्वास है सार्वभौम भी है |              योगीराज अरविंद

१२९ हिंदुस्थान

                          १२९  हिंदुस्थान


        हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचे स्थान. आपली भूमी आणि तीवर राहणारा समाज यांनी मिळून बनलेले हे नाव  आहे. या जनसमुदायास ' भारतीय राष्ट्र ' असेही म्हणतात.  
         गंगेस येऊन मिळणारे सारे प्रवाह गंगाजल बनवून जातात तसेच पिढ्यान् पिढ्या इथे राहणारे लोकही येथील राष्ट्र जीवनाची समरस होऊन गेले आहेत. ईसाई, पारशी मुसलमान त्यांचा उद्गम काही का असेना, कोणतीही उपास्य देवता ते मानीत असोत, या या भूमीत जन्मल्यामुळे तसेच येथे पालन-पोषण झाल्यामुळे या भूमीलाच जो सर्वतोपरी पूजनीय मानतो अशी प्रत्येक व्यक्ती या या भारतीय राष्ट्राचा घटक मानला जाणे योग्य होईल. हा हा देश एक आहे अविभाज्य आहे अनंत आहे.
                                                                                                       - श्री सुब्रह्मण्य भारती
         पूतना के स्तन के विष के साथ ही उसका दूध भी शोषित करने वाले भगवान श्रीकृष्ण का अनुयायी यह भारतवर्ष आधुनिक भौतिक संस्कृती के अनुकूल तत्व आचरण में लाकर आज की दुनिया में ' इदं ब्राह्मं इदं क्षात्रं, शापादपि शरादपि ' इस प्रकार का अप्रतिहत श्रेष्ठत्व प्रकट करेगा और किंकर्तव्य विमूढ विश्व का मार्गदर्शन कर भविष्य में मृत्युंजय भारत वर्ष इस नाते संसार मे प्रसिद्ध होगा |                                                                                           मा. बाबासाहेब आपटे
          पृथ्वीवर जर असा कोणता एखादा देश असेल की ज्याला आपण धन्य पुण्यभूमी म्हणू शकतो, जिथे चिकाटी, क्षमा, दया, पवित्रता इत्यादी मानवतेचे चांगले गुण सर्वात जास्त विकसित झाले आहेत,  तर ती भूमी  म्हणजे भारत होय .                                                                          स्वामी विवेकानंद
                                                                               

   
                                                                        

१८ . संघर्ष

                                             १८ संघर्ष 

   १ 
         मनुष्यत्व मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्याच्या विकासाच्या मार्गात निर्माण होणारा प्रत्येक अडथळा दूर करणे . जिथे कुठे अन्याय, अविचार दिसेल, तिथे निर्भयपणे उभे रहा, प्रतिकार करा, आणि तो अन्याय नष्ट करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करा . सध्याच्या काळात आत्मरक्षणार्थ आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी आम्हाला जी शक्ती हवी आहे ती रानावनातील किंवा एकांत गुहातील तपश्चर्येने मिळणार नाही . ती निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने संघर्षरत राहण्यानेच मिळेल .   
                                                                                                -  नेताजी सुभाषचंद्र बोस 

१६ . वनवासी कल्याण

                      १६ . वनवासी कल्याण 

     वनवासी भागात, गिरीकंदरात राहणाऱ्या आपल्या बांधवांजवळ जाऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणे, त्यांना निरनिराळी साधने उपलब्ध करून देणे, त्यांचे ऐहिक जीवन अधिक सुखी होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या अतःकरणात परमेश्वराच्या शुद्ध भक्तीच्या आधारावर हिंदू धर्माचा अभिमान जागृत करून एकात्मतेचा बोध निर्माण करणे यासाठी आपण प्रत्यक्ष परिश्रम करण्याची आवश्यकता आहे . दुसरा कोणी करील असे म्हणून चालणार नाही .                                                                                                                             -   पू . श्रीगुरुजी 
        आपल्या देशात जिथे कामाची अत्यंत आवश्यकता आहे असे क्षेत्र वनवासिंचेच व दुसरे दलित बंधूंचे आहे. परंतु या दोन्ही क्षेत्रात जे लोक काम करीत आहेत, त्यांच्या कामाचे स्वरूप आंदोलनात्मक आहे. आपल्या मागण्यांना आंदोलनाचे स्वरूप देऊन समस्या अधिक बिकट करणे हीच त्यांच्या कामाची पद्धत झाली आहे. शेवटी समस्यांची सोडवणूक विधायक पद्धतीनेच होईल हे आम्ही विसरता कामा नये. त्यासाठी त्या समाजातील लोकांमध्ये मिसळून निरनिराळ्या रचनात्मक योजना तयार करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे उपाय सांगण्याची आवश्यकता आहे.

१९ . प. पू . श्रीगुरुजी

                                      १९ प. पू . श्रीगुरुजी 

          देश व समाजसेवेपुढे प्रत्यक्ष ईश्वरप्राप्तीचा व अन्य सर्व मोह व लाभ अत्यंत गौण आहेत हे पू . श्रीगुरुजींच्या जीवनचरित्रापासून स्वयंसेवक व अन्य लोकांनी शिकले पाहिजे . अंगीकृत कार्य आपल्या संपूर्ण शक्तीनिशी शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहणे, कार्यानुकुल आपल्या व्यक्तिगत व पारिवारिक जीवनाची रचना करणे, आपल्या स्वभावात आवश्यक ते परिवर्तन करणे व कार्य सफल करणे हा आदर्श प . पू . श्रीगुरुजींच्या जीवनचरित्राने आपल्या समोर ठेवला आहे .                   - आप्पाजी जोशी 
     पू. श्री गुरुजींचे व्यक्तित्व कोहिनूर हिर्‍याप्रमाणे शतमुखी तेज पसरविणारे होते. हिऱ्यावर ज्या रंगाचा किरण पडतो तो त्यांचे तेज शंभर पटीने वाढवितो. असेच गुरुजींच्या समोर जी परिस्थिती उपस्थित होइल, ते तिला अंतर्बाह्य़ दृष्टीने विश्लेषीत करुन त्यावर मात करण्याचे उपाय दाखवून त्या दिशेने सर्वात पुढे पावले टाकीत असत.                                                -  मा. शेषाद्री

तुम्ही निर्दोष, निःस्वार्थ आणि निर्भय माणसाचे जीवन चरित्र पाहत आहात, जे केवळ स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी पूर्णपणे जगले. जगात किती लोकांविषयी असे म्हणता येईलयाहूनही महत्तम सांगायचे झाल्यास, श्री गोळवलकर गुरुजींनी भारत आणि तेथील जनतेसाठी केलेली सेवा म्हणजे, त्यांनी नेहमीच स्वतःच्या वाणी व कृतीतून त्या विशेष मूल्यांचे जतन केले,  जी मुल्ये राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि सुव्यवस्थित विकासासाठी आवश्यक आहेत.          रामकृष्ण आश्रमाचे पत्र 

२१. व्यायाम

                                   २१ व्यायाम 
   
      ' शारीरिक श्रम आणि खेळ या गोष्टी केवळ तरुणांसाठीच असतात ' अशी चुकीची धारणा काही लोकांच्या मनात घर करून बसली आहे . अशीच आणखी एक समस्या आहे . ' शारीरिक श्रम आणि उच्च जीवनस्तर या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत .' असा कोणी भूताने लोकांना कानमंत्र दिला आहे ! खरे तर शारीरिक श्रम आणि व्यायाम याद्वारे प्रत्येकाने आपणांस अत्यंत निरोगी नि उत्साही राखावयास पाहिजे . मन उत्साही असेल तरच शरीर स्फूर्तीशाली राहते; आणि शरीर स्फूर्तीने भरलेले असेल तर मन उत्साहाने पूर्ण राहते . 
                                                      - श्री . सुब्रह्मण्य भारती 

२० . पंथ समादर

                                 २० पंथ समादर 

          धर्मनिरपेक्षतेच्या चुकीच्या व्याख्येने आम्ही आपल्या नवयुवकांच्या पिढीला आपल्या गतकाळापासून वंचित केले असून भविष्याविषयी काहीच मार्गदर्शन केलेले नाही . ज्या कार्यास ते हातभार लावू शकतील अशी नवीन विश्वाची कसलीच कल्पना आम्ही त्यांच्या समोर उभी केलेली नाही . अशा लोकांना अथवा मानवजातीलाही देता येईल असा काही संदेश आपणाजवळ नाही .  
                                                            - डॉ . संपूर्णानंद 

२५ . समाज शिल्पी

                        २५  समाज शिल्पी 


     जगाची नवीन जडणघडण करू पाहणारे वा नवसमाज निर्मू इच्छिणारे महापुरुष कधीही समाजाच्या पारंपारिक चाकोरीत बांधले जात नसतात . त्यांचे मनोधैर्य प्रबळ असल्यामुळे ते कालविरोधी जुनाट चालीरीती, परंपरा, रूढी नि निर्बंध यात अडकून पडत नाहीत. ते परंपरेला कालसुसंगत रूप देतात . अज्ञानी लोक मात्र रुढीच्या दास्यात राहतात . सामान्य जनता तिच्या आज्ञेत राहते . परंतु , जीवित ध्येयाने धुंद झालेले कर्मवीर आपल्या प्रतिभेनुरुप समाज निर्मिती करतात .  
                                                                                                               -  धनंजय  कीर 

२६ . स्वातंत्र्य

                               २६ स्वातंत्र्य  

      
            कोणतेही गुलाम राष्ट्र क्रमशः उन्नती करीत स्वातंत्र्य प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होत नसते. प्रथम स्वातंत्र्यप्राप्ती करून ते उन्नतीचे सर्व मार्ग मोकळे करते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समाजात राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना आणि स्वातंत्र्याची आकांक्षा हि केवळ एकच उन्नती आवश्यक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी मार्गक्रमण करीत असता आवश्यक त्यावेळी बलिदानाचीही प्रेरणा निर्माण होऊ शकेल.                          - पू . श्रीगुरुजी 

       स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या बुटांना पॉलिश करण्यापासून, तो तेच बूट पायातून काढून त्यांचे डोके रक्तबंबाळ करीत मारण्यापर्यंत सर्व मार्ग माझी स्वातंत्र्यप्राप्तीची साधने होऊ शकतात. कोणत्याही मार्गाविषयी माझ्या मनात तिरस्काराचा भाव नाही . इंग्रजांना बाहेर हाकलून देश स्वतंत्र करणे एवढेच मला ठाऊक आहे.                                                 - पू. डॉ. हेडगेवार

         क्या आप खिले हुए गुलाब की सुगंध चाहते है । यदि हां,  तो आपको काटे भी स्वीकार करने पडेंगे । यदि आप मुस्काते उषः काल की मधुरिमा चाहते है, तो आपको अंधेरी रात के कराल घंटों को बीताना पडेगा । यदि मुक्ती के आनंद और स्वतंत्रता का समाधान चाहते, तो उसकी किंमत चुकानी पडेगी और स्वतंत्रता की किंमत है, कष्ट सहन करना ।                                                                                            - नेताजी सुभाषचंद्र बोस 

४  
          अनुदारतेचा दोष दिला गेला तरीही सर्वप्रथम विदेशी दास्यतेच्याअवशेषांना समूळ उखडून फेकून दिले पाहिजे. यातूनच प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण होईल आणि विश्वातील विभिन्न देशांमधील समाजांसमोर निर्भयतेने व निःशंक होऊन सामोरे जाण्याची स्वाभिमानी दृष्टी प्राप्त होईल.                             - पू . श्रीगुरुजी

           एखाद्या विशिष्ट जीवनदर्शनावर विश्वास म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याला विरोध नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्यास मोकळीक नव्हे. बौद्धिक स्वतंत्रतेच्या नावावर चालणाऱ्या स्वैर व उच्छंखल व्यवहाराचे कोणीही स्वागत करीत नाही. जंगलाचेही काही नियम बंधने असतातच. मानवता जिवंत राहायची असेल तर आपल्या आजपर्यंतच्या अनुभवातून भविष्याचा वेध घेऊन त्याच्या आधारावरच व्यक्तिगत व सामूहिक व्यवहारासाठी काही नीती-नियम निश्चित करावेच लागतील.                                                                        डॉ . संपूर्णानंद


२४ जीवनमूल्ये

                                                      २४  जीवनमूल्ये 

     ज्या जीवनमूल्यासाठी भारत सदैव झगडतो आहे ती जीवनमूल्ये केवळ भारताची नसून अवघ्या विश्वाची आहेत . आम्ही आधुनिकतेतील सामर्थ्य आणि प्राचीनतेतील संतोष यांचा समन्वय साधू इच्छितो . विज्ञानाच्या जोरावर जगातील उन्नतीशील देश अधिकाधिक शक्तीशाली बनत आहेत . परंतु जसजशी त्यांची परंपरा आणि शक्ती वाढते आहे तसतशी त्यांचे समाधान आणि शांतता यांचा लोप होतो आहे . विज्ञानास आत्मसात करूनही त्यांचे दास मात्र बनणार नाहीत असाच मार्ग आम्हांस भारतात शोधायचा आहे . आमचे ऐश्वर्य आणि शक्ती अवश्य वाढावी पण संपत्तीसाठी वेडे होऊन भरकटत जाणे कधीच घडू नये . 
                                               - राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर
२ 
      मानवीय जीवनाला मौल्यवान बनवण्याची क्षमता ज्या गुणांमध्ये असते त्या गुणांना जीवनमूल्य म्हणतात . त्यांना भगवद्गीतेमध्ये दैवी संपदा असे म्हटले गेले आहे. प्रगतीशील व्यक्ती व राष्ट्र यांच्याही याच कसोट्या आहेत. हि मुल्ये शाश्वत आहेत आणि मानवते बरोबरच निर्माण झालेली आहेत.  
                                                               - श्री. प्र. ग. सहस्रबुद्धे

     संसारिक सुख सोयींना सोडून निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रचंड संघटन अध्यात्मिक जीवनमूल्यांची वैचारिक बैठक असल्याखेरीज निर्माण होऊ शकत नाही. त्यांच्या आधारावरच भोगवादाला परास्त करून अध्यात्मिक विचारांची विजय पताका फडकवणे शक्य आहे. आपल्या पुरुषार्थाच्या आधारावरच आपले हिंदुराष्ट्र आम्ही सामर्थ्यवान बनवू. अशी हिंदू नवयुवकांमध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण करण्याच्या कार्यासच संघ लागला आहे. आणि त्याच्या आधारावरच प्रथम भारतामधून व नंतर साऱ्या जगामधून भोगवादाचे झेंडे उखडून टाकू.

२३ . स्वदेशी

                                २३ . स्वदेशी

          एक वेळ आमची सत्ता हिंदी लोकांना देऊ पण व्यापार त्यांच्या हातात देणार नाही या ब्रिटीशांच्या नीतीकडे आजपर्यंत आमची नजर गेली नव्हती . स्वदेशाचा शत्रू आणि स्वदेशीचा शत्रू यात काही भेद नाही . देशाची उन्नती किंवा अभ्युदय स्वपराक्रमानेच प्राप्त करून घेण्यास आपण झटले पाहिजे . 
                                                                                                                             -  लोकमान्य टिळक 

         स्वदेशी हा शाश्वत धर्म आहे. त्याचा व्यवहार प्रत्येक युगात बदलत राहील आणि बदललाही पाहिजे. स्वदेशी हा आत्मा आहे. स्वदेशी एक सेवाधर्म आहे. हा सेवाधर्म आपण जर नीट समजून घेतला, तर आपले, आपल्या परिवाराचे, आपल्या देशाचे व सा-या जगाचे कल्याण होईल. स्वदेशीत स्वार्थ नाही, परमार्थ आहे. म्हणून मी त्यास यज्ञ मानतो.                                                                                                                                 - महात्मा गांधी
          स्वदेशीचा कार्यक्रम तात्पुरता नाही. तो स्वराज्याबरोबर सतत चालणारा आहे. परदेशांच्या हितासाठी हिंदुस्थानने आळशी, दरिद्री राहावे हा विचार कोणालाच पटणारा नाही. जर आपल्याला पोटभर खायला प्यायला आणि अंगभर वस्त्र लेऊन लज्जा निवारण व्हावयास हवे असेल तर यावेळी हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाने स्वदेशी धर्माचा अंगीकार केला पाहिजे. एक पुरुष परस्त्रीवर नजर टाकतो त्यासारखे परक्या देशांच्या वस्तुंवर नजर टाकणे हा व्यभिचार आहे.                                                                                               - महात्मा गांधी
         स्वदेशीची चळवळ हि देशभक्तीची व आर्थिक सुबत्तेची चळवळ आहे. मातृभूमि संबंधीचे उत्कट प्रेम स्वदेशीमधून प्रत्ययास येते. स्वदेशीतून मातृभूमीसाठी त्याग करण्याची शिकवण मिळते, समाजात बंधुभाव निर्माण होऊ शकतो व देशाची आर्थिक प्रगती साधणे शक्य होते. स्वदेशीचे प्रेम हे समाजातील सर्व थरांतील गटांपर्यंत पोहोचविणे हि देशाची आज नितांत गरज आहे.                            - नामदार गोपाळकृष्ण गोखले 

       परकीय मदतीच्या कुबड्या फेकून दिल्या तरच भारताची यापुढे प्रगती होऊ शकेल. कारण परकीय मदतीमुळेच आपल्या सवयीच बदलून गेल्या आहेत. आपल्याला स्वदेशीच्या महामंत्राचे पार विस्मरण होऊ लागलेले आहे. असे विस्मरण व्हावे अशीच विदेशी शक्तींची योजना आहे. भारताचे आर्थिक प्रश्न, परकीय मदत कमी पडत आहे म्हणून बिकट झालेले नसून अतिरिक्त परकीय मदत येत आहे, त्यामुळे आपण स्वदेशी आणि स्वावलंबन विसरत चाललो आहोत म्हणून निर्माण झालेले आहेत. ही मदत आपल्याला उपयुक्त ठरत नसून परकीय राष्ट्रांची मंदी, बेकारी दूर करून यांची अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी तिचा वापर होत असतो.   पं. दीनदयाळ उपाध्याय

     “ब्रिटिशांचा ताबा आणि त्यातून निर्माण झालेल्या वसाहतवादी मानसिकतेने भारताला त्याच्या आत्म्यापासून वेगळे करण्याचे अनेक प्रभावी प्रयत्न केले. पण ही भारतीय मनाची ही उपजत ऊर्जा आहे की हे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत.आजही स्वदेशी मूल्यांच्या आधारावर देश घडवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.”                                                                                  मा. धर्मपालजी 




३३ . हिंदुत्व

                                ३३ हिंदुत्व  
    

           अपने देश में एक जन है। एक संस्कृति है।  एक राष्ट्र है।  हमारी यह मातृभूमि है, हम उसकी संतान है।  हम सब एक परिवार के सदस्य है।  राम-कृष्ण हमारे राष्ट्रीय पुरुष है।  वेद-उपनिषद्, रामायण- महाभारत आदि हमारे राष्ट्रीय ग्रंथ है। यहाँ के जो उत्सव है वे हमारे राष्ट्रीय उत्सव है। यहाँ की परंपरा राष्ट्रीय परंपरा है। उस शास्त्रीय विचार को लेकर हमने कहा है कि हिंदुत्व यही राष्ट्रीयत्व है।   
                                                                                                          -  दत्तोपंत ठेंगडी 
            हिंदुत्वाचा वारसा हीच राष्ट्रीय एकात्मतेची सर्वाधिक शक्ती आहे, जिने विभिन्न जाती आणि धार्मिक विभिन्नतेतही ' एक राष्ट्र ' बनविले. आज आपण पाहतो की, पृथ्वीवरील साऱ्या प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या  आणि जगातल्या प्रचंड शक्तींच्या सतत होणाऱ्या  आघातातूनही  भारत एक राष्ट्र म्हणून जिवंत राहिला. या  सर्वांचे  खरे  कारण  हेच की भारताच्या  इतिहासात  हिंदुत्व  हेच एकात्मतेचे आधारभूत तत्व राहिले. हिंदुत्व हे असे ऐक्यसूत्र आहे की ज्यामुळे सर्वांना एकात्म राष्ट्राच्या स्वरुपात सामावून टाकले.

३ 
        हिंदुस्थानातील अतिश्रेष्ठ योग्यतेच्या हिंदू मनाकडून हिंदुत्वासंबंधी सर्वकष विचार इतिहासकालात येथे प्रथमच झालेला दिसतो. यानंतर युगानुयुगापर्यंत जिज्ञासू हिंदूला आणि आपल्या मुलांना धर्म शिकवणाऱ्या मातेला निश्चित ज्ञान आणि प्रेरणा प्रकाश यासाठी याच पुस्तकाची पाने उलटावी लागतील.                                                                   -  भगिनी निवेदिता 

४ 
        हिंदुत्व म्हणजे गतिमानता, स्थितीशीलता नव्हे . हिंदुत्व एक प्रक्रिया आहे, परिणाम नाही . हिंदुत्व एक विकासशील परंपरा आहे, अपरिवर्तनीय ईश्वरीय आदेश नाही . त्याचा जुना इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला असे विश्वासाने म्हणता येईल की, इतिहासाच्या आणि चिंतनाच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही संकटाला तसेच आह्वानाला, हिंदुत्व पूर्ण सामर्थ्यानिशी तोंड देईल . 
                                                                  - सर्वपल्ली राधाकृष्णन 

     मीनाक्षीपुरम ची घटना देशभरातील हिंदूंना संकटाची सूचना ठरली. तामिळनाडूतील हिंदू विशेषत्वाने जागे झाले. सर्व मठाधिपती आपल्या मठातून बाहेर पडले. स्पृश्य-अस्पृश्य सर्व जाती जमातींचे पंथांचे प्रमुख हिंदू एकता संमेलनात सामील होऊ लागले. समता व सामंजस्य यांचा घोष त्यांच्या भाषणातून होऊ लागला. सामाजिक व धार्मिक नेत्यांनी शेकडो वर्षांनी उपेक्षित बंधूंना प्रेमाने आलिंगन दिले. त्यांचे कुशल विचारले. त्यांना त्यांच्या पूर्वीच्या धर्मात परत सुप्रतिष्ठित केले. ही सर्वात महत्त्वाची बाब होय. अशा प्रकारे पुन्हा हिंदुत्वाची लाट उत्पन्न झाली.

        " हिंदू "शब्द के आसपास जो विचार और आदर्श, संरचनाऍं और समाज, भाव और भावनाऍं केंद्रीभूत हुई हैं वे इतनी विविध और इतनी संपन्न, इतनी शक्तिशाली और इतनी सूक्ष्म, इतनी मायावी फिर भी इतनी स्पष्ट हैं की " हिंदुत्व " शब्द का विश्लेषण करना ही एक टेढी खीर बन गया है | अधिक नहीं तो कम से कम चालीस शताब्दीयों ने अपने क्रियाकलापों से इसे गढा है |अनेक ईशदूत और कवि, विधी-निर्माता और विधिवेक्ता, शूर और इतिहासज्ञ, इस बात के लिए जिये, लढे और मरे कि यह शब्द ऐसाहि बना रहे | और क्यों न हो, क्या यह शब्द हमारी जाती की ऐसी असंख्य कृतियों का परिपाक नहीं है, जो कभी टकरायी तो कभी धुलमील गयीं और कभी हाथ में हाथ डालकर परस्पर सहयोग करती रहीं ? हिंदुत्व एक शब्द नाहीं बल्कि एक इतिहास है |                                     वीर सावरकर

        ज्या भारतात उत्तरेत मायापुरी, मध्यभागात अवंतिका आणि दक्षिणेत कांची अशी पवित्र नगरे आहेत, ज्या देशात गंगा, सिंधू, सरस्वती व दक्षिणेत असलेली कावेरी या नद्यांना पवित्र मानतात, ज्या देशात चारी दिशांना पवित्र तीर्थे स्थापिलेली आहेत, अशा देशाला एक सूत्रात गुंफणारी एक विचार प्रणालीही नक्कीच आहे.                                                                    डॉ . संपूर्णानंद

२२ गौरवशाली भूतकाळ

                      २२ गौरवशाली भूतकाळ  

     काही लोक आधुनिकतेच्या बेटावर राहतात . भूतकाळ हा दिवाळखोरीचा असून त्यातून घेण्याजोगे काही नाही अशी त्यांची समजूत असते . आघाडीवर पराक्रम करणारे सैनिक पिछाडीवरील शिदोरीच्या आधारावरच लढत असतात यावर त्यांचा विश्वास नसतो . त्यांना हे आवर्जून सांगितले पाहिजे की जेव्हा एखाद्या समाजाला त्यांच्या विचारांची बीजे त्या समाजाच्या समृध्द परंपरेत सापडतात तेव्हाच त्या समाजाच्या गौरवशाली पुनरुत्थानाच्या कालखंडाला प्रारंभ होतो . 
     ज्या दुर्दैवी लोकांनी आपली समृद्ध परंपरा हरवली आहे, त्यांनी वर्तमानकाळही गमावला आहे . समृद्धतेचे बीजारोपण करण्याची जमीन त्यांच्यापासून दुरावली असून आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार भटकत आहेत . जगातील अशा लोकांमध्ये आम्हीही एक आहोत असा गैरसमज आपण करून घेत कामा नये .  
                                                                                                            - रविंद्रनाथ टागोर  

         भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा. तुमच्या मागे जो अनंत जीवन प्रवाह आहे, त्याचे येथेच्छ प्राशन करा आणि पुढे पहा. पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा. आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा. आम्ही प्रथम त्या तत्त्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत. त्या रक्ताला समजले पाहिजे की जे आमच्या नसानसातून वाहत आहे. आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. भूतकालातील ती श्रेष्ठता व चेतना, त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे.  
                                                                                                        - स्वामी विवेकानंद
          आम्ही अस्सल भारतीय रहावे; युरोपीय बनू नये, ही ईश्वराची इच्छा आहे ! परंतु आम्ही आमच्या सत्तेहून भिन्न अशा अन्य कोणाच्या सत्तेच्या नियमांचे पालन करून जीवनाच्या पुनर्प्राप्तीची धडपड केली आहे. आता आम्हास येथून परत फिरले पाहिजे आणि जीवन व शक्तीचे मूल स्त्रोत आपल्यातच शोधले पाहिजेत. आपल्या अतित कालाचे ज्ञान आपणा स्वतःच प्राप्त करून घ्यावयाचे आहे; आणि आपल्या भवितव्यासाठी त्याचा पुन: उपयोग करावयाचा आहे.                                                                                                       ऋषी अरविंद

२७. विविधतेत एकता

                                                     २७  विविधतेत एकता  

              ज्याप्रमाणे एक रेशमाचा धागा निरनिराळ्या रंगीबेरंगी हिऱ्यांचा एक सुंदर हार गुंफतो. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या विविधतेतसुद्धा एक एकत्वाचा धागा असल्याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यास लक्षात येते . यातील कोणताही हिरा वेगळा नाही . आपल्या स्वतःच्या सौंदर्याने तो केवळ मोहित करत नसून अन्य हिऱ्यांच्या सौंदर्यातही भर टाकीत असतो . ही काही कोरी कविकल्पना नसून एक पूर्ण प्रस्थापित सत्य आहे .  
                                                                                                        - डॉ . राजेन्द्रप्रसाद
           एकता, एकता, प्रत्येकालाच एकतेची गरज असल्याचे अनुभवास येते . शेकडो व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने काम करतात तेव्हा त्याचा परिणाम होतो ' शून्य.  '  जोपर्यंत एकाच दिशेने प्रयत्न करणे किंवा एकच ध्येय निश्चित होत नाही, सर्वजण त्या एका विशिष्ट दिशेनेच प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या उन्नतीची आशा करणे व्यर्थ .  कल्याणामध्येच प्रत्येक व्यक्तीचे हित आहे ही गोष्ट सर्वांत अगोदर आपणांस समजली पाहिजे .                        स्वामी रामतीर्थ 

       ' अनेकता मे एकता ' का हमारा वैशिष्ट्य हमारे सामाजिक जीवन के भौतिक एवं आध्यात्मिक सभी क्षेत्रों में व्यक्त हुआ है | यह उस एक भव्य दीपक के समान है, जो चारों ओर विविध रंगों के शीषों से ढका हुआ हो | उसके भीतर का प्रकाश, दर्शक के दृष्टिकोन के अनुसार भांति भांति के वर्णो एवं छायाओं में प्रकट होता है |              श्रीगुरुजी

३१ . ध्येय पथिक

                             ३१ ध्येय पथिक  
     
   
           एका महान ध्येयसिद्धीचे आपण साधन बनू या , ध्येयदेवतेच्या हातातील एक खेळणे बनू या . ध्येयदेवतेचे दास ! याहून श्रेष्ठतम पदवी दुसरी कोणती असणार ? जीवनाच्या कंटाकाकीर्ण मार्गावरून ध्येयध्रुवाकडे लढत - भिडत, संघर्ष करीत, आघात करीत आणि झेलत पुढेच जात राहू या . आता थांबणे नको, भीती नको, निराशा आणि मृत्यू यांच्या भयानक तांडवामध्येही आनंदाने धुंद होऊन, मोठ्या दिमाखात आपण पुढे आणि पुढेच जाऊ या आणि यश प्राप्त करूनच घेऊ या. 
                                                                                                       - भगिनी  निवेदिता 
               
          संघाच्या ध्येयाची पूर्तता करण्याकरिता आपल्याला काय केले पाहिजे याची नीट जाणीव प्रत्येक स्वयंसेवकाने करून घेतली पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाची हीच भावना पाहिजे कि मी आणि माझे सर्वस्व संघाकरता म्हणजे राष्ट्राकरता आहे. प्रत्येक स्वयंसेवकाच्या नसानसात देशप्रेमाची भावना असली पाहिजे. स्वयंसेवक केवळ हंगामी देशभक्त असून उपयोगी नाही. सर्व स्वयंसेवकांची वृत्ती जर याप्रमाणे संघमय झाली तर आपले ध्येय आपण लवकर गाठू शकू.                                                                                    - पु. डॉ. हेडगेवार  

 
           उज्ज्वल भारतवर्षाचे एक सुंदर चित्र तुमच्यापुढे असले पाहिजे. या ध्येयावर प्रेम करा. हे प्रेम सर्व विरोधी शक्तींना पुरुन उरेल. देशाच्या अणू-अणूवर तुमचे प्रेम असले पाहिजे. परिस्थितीला पायाखाली तुडवून ताठ उभे राहा. खरा पुरुष तो जो ऐन आत्मबलिदानातसुद्धा मृत्यूकडे निर्भय चित्ताने पाहील .
                                                                    - भगिनी  निवेदिता 
        संघ के सिद्धांत पर अटल श्रद्धा रखो | हिम्मत और आत्मविश्वास से काम लो | हम लोग स्वदेश, स्वधर्म और अपनी संस्कृती की रक्षा के लिये कटिबद्ध है | हमें सत्य का अधिष्ठान है | अत:  किसी संकट से भयभीत होने का या घबराने का कोई भी कारण नहीं | आपत्तीयां यों ही उपस्थित नहीं होती | वे तो परमात्मा की कृपा सूचित करती है | संकटों द्वारा कसौटी पर कसने की कृपा सूचित करती है | संकटों द्वारा कसोटी पर कसने और उसमें सफल होने पर आगे का उन्नत मार्ग हमें दिखाने की ईश्वरी इच्छा ही उस से जाहीर होती है |                                                      डॉ. हेडगेवार

                                            

२९ . राष्ट्रीयता

                                २९  राष्ट्रीयता 

१ 
     आपल्या समाजाकडे मनुष्यबळ होते, धनभांडार होते,  शस्त्रे होती, परंतु मी या राष्ट्राचा घटक आहे म्हणून जीवनात राष्ट्रहिताला अग्रस्थान द्यावयास हवे . आणि जरूर पडल्यास आपले सर्वस्व राष्ट्रहितासाठी समर्पित करावयास हवे याची जाणीव नव्हती . म्हणून सर्व प्रकारे बलशाही असूनही आपला समाज परास्त झाला . म्हणून सर्वात आधी हिंदू समाजामध्ये ही राष्ट्रीय वृत्ती जागृत करून, त्याला संघटीत करण्याची आवश्यकता आहे .  
                                                                                                        - लक्ष्मणराव इनामदार 

२ 
      अपने देश में एक जन है। एक संस्कृति है।  एक राष्ट्र है।  हमारी यह मातृभूमि है, हम उसकी संतान है।  हम सब एक परिवार के सदस्य है।  राम-कृष्ण हमारे राष्ट्रीय पुरुष है।  वेद-उपनिषद्, रामायण- महाभारत आदि हमारे राष्ट्रीय ग्रंथ है। यहाँ के जो उत्सव है वे हमारे राष्ट्रीय उत्सव है। यहाँ की परंपरा राष्ट्रीय परंपरा है। उस शास्त्रीय विचार को लेकर हमने कहा है कि हिंदुत्व यही राष्ट्रीयत्व है। 

       प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय विचार असतो. विश्वधारणेसाठी असा विचार असणे आवश्यक असते. ज्या दिवशी विश्वधारणेसाठी हा विचार अनुपयोगी होईल त्या दिवशी हा विचार करणारी व्यक्ती असो व राष्ट्र असो ते नष्ट होईल. दुःख, दैन्य, दारिद्र्य व देशांतर्गत, देशाबाहेरून अत्याचार होऊन सुद्धा हा देश जिवंत आहे. कारण या देशाचा राष्ट्रीय विचार विश्वधारणेसाठी आवश्यक आहे.                                                -  स्वामी विवेकानंद

२८ . गुण संवर्धन

                             २८ गुण संवर्धन 


        जो समाज आपल्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आवश्यक गुणांचे संवर्धन करतो आणि त्या उज्ज्वल गुणांची एक परंपरा निर्माण करून अशी एक व्यवस्था उत्पन्न करतो की, ज्यामुळे एका पिढीतून दुसर्या पिढीत त्या गुणांचा विकास होत जावा, तोच समाज आपले जीवन सार्थकी लावून या जगामध्ये एक सुस्थिर व संरक्षित समाज या नात्याने चिरंतन राहतो . अशा गुणांच्या सतत संवर्धनाने तो विशाल होत जातो व विशाल होत असतानाच त्याची विजीगीषाही वाढत जाते . 
                                                                         - भय्याजी  दाणी 
          राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कल्पिलेल्या वैभवाच्या रुपरेषेत सामान्य माणसालाच प्रमुख स्थान दिले गेले आहे. सामान्य माणसाच्या राष्ट्रीय व व्यक्तिगत चारित्य्राची पातळी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात जितक्या प्रमाणात उत्कृष्ट गुण असतील तितक्या प्रमाणात देश मोठा व प्रगतिशील मानला जाईल. 

         संघकार्य का उद्देश समर्थ, गुणसंपन्न, मनोहारी, चरित्रवान, प्रामाणिक, निर्भय, कर्तव्यकठोर, त्यागी, विजिगिषु वृत्ती के लोगों की परंपरा निर्माण करना और उनके जीवन में इन गुण सुमनोंसे व्याप्त सुगंधी के द्वारा समाज में सामूहिक जीवन की आदत निर्माण कर संपूर्ण समाज में इन्ही गुणो की निर्मिती करना है | जिस प्रकार स्वर्ण आग में तपाने से शुद्ध ही होता है, उसी प्रकार कर्तव्य-पथ पर अग्रसर होने वाले व्रती लोगों के गुणों में संकट से संघर्ष लेने के कारण कुछ चमक ही आती है | इस प्रकार गुणों का विकास हो कर, अशुद्धता नष्ट होकर, ऐसे लोगों का सामर्थ्य और आकर्षण दोनों बढते हैं |.                                                                 मा. भैय्याजी दाणी

३५ कर्मयोगी

                                ३५  कर्मयोगी 
    
     आम्ही गौरवास्पद भूतकाळालाच राष्ट्रजीवनाचा परमोच्च बिंदू मानीत नाही . वर्तमानकाळाकडे आम्ही वास्तववादी दृष्टीतून पाहतो . पण त्याचेशी स्वतःलाच जखडून घेत नाही . आमच्या दृष्टीसमोर वैभवशाली भविष्याचे ' सोनेरी स्वप्न ' आहे . पण आम्ही स्वप्नाळू नाही तर त्या भविष्याला साकार करणारे जागृत कर्मयोगी आहोत . अनादी भूतकाळ, अस्थिर वर्तमानकाळ व अनंत भविष्यकाळ यांचेवर विजय मिळविणाऱ्या कालजयी हिंदू संस्कृतीचे आम्ही पुजारी आहोत . 
                                                                                                  - पं . दीनदयाळ उपाध्याय  

 जगाची नवीन जडणघडण करू पाहणारे वा नवसमाज निर्मू इच्छिणारे महापुरुष कधीही समाजाच्या पारंपारिक चाकोरीत बांधले जात नसतात . त्यांचे मनोधैर्य प्रबळ असल्यामुळे ते कालविरोधी जुनाट चालीरीती, परंपरा, रूढी नि निर्बंध यात अडकून पडत नाहीत. ते परंपरेला कालसुसंगत रूप देतात . अज्ञानी लोक मात्र रुढीच्या दास्यात राहतात . सामान्य जनता तिच्या आज्ञेत राहते . परंतु , जीवित ध्येयाने धुंद झालेले कर्मवीर आपल्या प्रतिभेनुरुप समाज निर्मिती करतात .              -  धनंजय कीर

         आपण कर्मठ झाले पाहिजे. आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आपल्या पवित्र कार्याच्या योगाने संपूर्ण समाजाचे संघटन होईल. एक दिव्य शक्तिशाली सर्वगुणसंपन्न असे वैभवशाली राष्ट्र निर्माण होईल. त्याची ज्योत जगभर प्रकाश पसरवून सुख शांती देईल, अशा तऱ्हेचा श्रेष्ठ भाव अंतःकरणांमध्ये धारण करून आपली संपूर्ण शक्ती आपल्या कार्यावर केंद्रित करावी हीच सर्वांकडून अपेक्षा आहे.
       मनुष्यत्व मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्याच्या विकासाच्या मार्गात निर्माण होणारा प्रत्येक अडथळा दूर करणे. जिथे कुठे अन्याय, अविचार दिसेल, तिथे निर्भयपणे उभे रहा, प्रतिकार करा आणि तो अन्याय नष्ट करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करा. सध्याच्या काळात आत्मरक्षणार्थ आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी आम्हाला जी शक्ती हवी आहे ती रानावनातील किंवा एकांत गुहातील तपश्चर्याने मिळणार नाही. ती निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने संघर्षरत राहण्यानेच मिळेल.                 नेताजी सुभाष

१३० आस्था

                                     १३०  आस्था  

           जेव्हा मी हिंदुंमध्ये आस्था कमी आहे अशी तक्रार करतो त्यावेळी माझा हेतू  ( अर्थ - अभिप्राय ) व्यक्तिगत असत नाही तर सामाजिक आस्था जी विजयाची जनक ( निर्माती ) आहे, ती आस्था कि जी समुदायाला जागृत करून उभी करते . आपली निर्यात, आपले जीवनहेतू  ( ध्येय ), आपल्या महाकाव्यातील ध्येयासंबंधी आस्था, संघर्षासाठी सिद्ध असणारी आस्था,आपल्या हृदयात आपला धर्म आणि भावी प्रगती हे ध्येय ठेवून परमात्मा आणि मानवी कल्याणाचा मार्ग निःशंक व निर्भय होऊन पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी आस्था तीच ही आस्था आहे की जी आज आपल्या राष्ट्रास सुदृढ करण्यासाठी नितांत आवश्यक आहे .                                                           - लाला  लजपतराय