शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०६

                      विवेकानंद अमृत ३०६

     आपल्या पूर्वजांची लाज न बाळगणे हे मी माझ्या आयुष्यातले एक महत्वाचे तत्व समजत आलो आहे . मी स्वाभिमान्यामधला स्वाभिमानी माणूस आहे . पण हे मी स्पष्टच सांगतो की, हा स्वाभिमान स्वतःच्या कर्तृत्वाचा नसून पूर्वजांकडून जे धन मिळाले आहे त्याचा आहे . मी जेवढा  वळून पाहतो, इतिहासाचा जेवढा अभ्यास करतो तेवढा माझा स्वाभिमान प्रदीप्त होतो . या स्वभिमानानेच मला सामर्थ्य, निष्ठा आणि धैर्य दिले आहे . धुळीतून उचलून उभे केले आहे . आणि पूर्वजांच्या वंशचैतन्याने योजलेल्या कार्याला प्रवृत्त केले आहे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा