गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१९

                       विवेकानंद अमृत ३१९

     हिंदूंचे सर्वप्रथम ध्येय आहे मुक्ती . पाश्चात्यांचे सर्वप्रथम ध्येय आहे धर्म . आपण मुक्तीची कांक्षा धरतो ; ते धर्माची धरतात . मीमांसक ज्या अर्थाने धर्म हा शब्द वापरतात त्या अर्थाने मी तो वापरीत आहे . ज्यामुळे इह आणि परलोकात माणूस सुखाची इच्छा बाळगतो तो धर्म . धर्म हा कर्मावर आधारित आहे . धर्म हा माणसाला सुखाच्या पाठीमागे धावायला लावत असतो आणि आनंदप्राप्तीसाठी काम करायला लावत असतो . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा