बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

१२५ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

              १२५ स्वातंत्र्यवीर  विनायक  दामोदर सावरकर


        बरे, ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच . तोवर जर या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की, मुलांमुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे ह्यालाच जर संसार म्हणावयाचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही  करीतच आहेत ! पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ घ्यावयाचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत . आपली चार चूलबोळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल . 

                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा