बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

१२३ स्नेहसंबंध

                                               १२३ स्नेहसंबंध 
१ 
            एकाच विचारधारेचे लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्यात मतभेद उत्पन्न होऊ शकतात. आणि त्यात स्पर्धा उत्पन्न होऊन ते प्रतिस्पर्धी बनू शकतात. या अवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ' व्यक्तिगत स्पर्धा टाळणे ' हाच श्रेष्ठ उपाय आहे. ध्येयनिष्ठे बरोबरच जर संस्थेविषयीचे प्रेम असेल तर काही प्रमाणात तणाव उत्पन्न झाला तरी असा विचार केला जातो की ' मी या संस्थेपासून दूर जाणार नाही. ' जेव्हा कार्यकर्त्यात परस्पर घनिष्ठता, व्यक्तिगत स्नेहसंबंध आणि जवळीक असेल तर मग त्यास कोणासाठी संस्थेपासून दूर जाणे, भांडण करणे, संस्थेपासून अलिप्त राहणे सोपे तर नसतेच उलट फार कठीण असते. अशा घनिष्ठ प्रमाणात लोकांचे परस्परसंबंध निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.

२ 
       आज संपूर्ण देशामध्ये भाषा, संप्रदाय, प्रांत इत्यादी विषयी भेदाचे विष भरलेले आहे, वाढत आहे. स्वार्थी राजकीय पक्ष वाढवित आहेत. ते विष उतरवून राष्ट्र शरीराला निरोगी व सुदृढ बनविण्यासाठी संघकार्य सोडून अन्य कोणतेही औषध नाही. सर्व विषयांना निर्विष बनविणारे हे साक्षात अमृत आहे. या दृढ श्रद्धेने व विश्वासाने आपल्या स्थानी पक्के राहून आपल्या बांधवांचे अंतःकरणातील सुप्त आत्मियत्व जागृत करण्याचे कार्य आपल्याला स्नेहाने, प्रेमाने करायचे आहे. कोणत्याही हिंदू व्यक्तिबद्दल व समूहाबद्दल मनात द्वेष न ठेवता, कोणावरही दोषारोपण न करता कौशल्य व अकृत्रिम प्रेमाचा व्यवहार यासाठी आवश्यक आहे. संपूर्ण देशात विषवायू पसरलेला आहे. त्याच्या प्रभावाने लोक मनापासून नाही तरी प्रवाहपतीत होऊन दुष्टपणा करतात. हे लक्षात घेऊन हे विषमय वातावरण दूर करण्याचे सहसपूर्ण कार्य आपल्याला करायचे आहे.                                                      प. पू. श्रीगुरुजी
        
                                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा