१६० पाचनशक्ती
१
दुसऱ्याच आत्मसात करण्यासाठी प्रतिभाशक्ती आवश्यक असते. इतरांच्यात प्रवेश करण्याची शक्ती आणि त्यांना पूर्णतः आत्मसात करून टाकण्याची जादू हीच त्या प्रतिभाशक्तीची वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रतिभाशक्तीचे दर्शन भारतात घडते. भारतवर्षाने नि:संकोचपणे इतरांत प्रवेश केला आणि सहजपणे त्यांच्या कितीतरी गोष्टी आत्मसात केल्या. विदेशी लोक ज्याला ' पांतलिकता ' (मूर्ती पूजा) संबोधतात त्याला पाहून भारतवर्ष कधी भयभीत झाला नाही. किंवा त्याने आपले नाक मुरडले नाही. ( तोंडही वाकडे केले नाही-नापसंती व्यक्त केली नाही) भारताने पुलिद, शब्बीर, व्याध इत्यादीकांकडून काही हीन गोष्टींचा स्वीकार करून त्यांत आपल्या भावनांची भर घातली व त्यांचेमध्ये आपली आध्यात्मिकता प्रकट केली. भारतवर्षाने कुणालाही दूर लोटले नाही, सर्वांना जवळ घेऊन आत्मसात करून टाकले. रवींद्रनाथ ठाकूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा