बुधवार, १० डिसेंबर, २०२५

१६० पाचनशक्ती

                                                               १६० पाचनशक्ती

         दुसऱ्याच आत्मसात करण्यासाठी प्रतिभाशक्ती आवश्यक असते. इतरांच्यात प्रवेश करण्याची शक्ती आणि त्यांना पूर्णतः आत्मसात करून टाकण्याची जादू हीच त्या प्रतिभाशक्तीची वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रतिभाशक्तीचे दर्शन भारतात घडते. भारतवर्षाने नि:संकोचपणे इतरांत प्रवेश केला आणि सहजपणे त्यांच्या कितीतरी गोष्टी आत्मसात केल्या. विदेशी लोक ज्याला ' पांतलिकता ' (मूर्ती पूजा) संबोधतात त्याला पाहून भारतवर्ष कधी भयभीत झाला नाही. किंवा त्याने आपले नाक मुरडले नाही. ( तोंडही वाकडे केले नाही-नापसंती व्यक्त केली नाही) भारताने पुलिद, शब्बीर, व्याध इत्यादीकांकडून काही हीन गोष्टींचा स्वीकार करून त्यांत आपल्या भावनांची भर घातली व त्यांचेमध्ये आपली आध्यात्मिकता प्रकट केली. भारतवर्षाने कुणालाही दूर लोटले नाही, सर्वांना जवळ घेऊन आत्मसात करून टाकले.                                                                                  रवींद्रनाथ ठाकूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा