बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९८

                        विवेकानंद अमृत २९८

     आपले चैतन्य, आपले सामर्थ्य, नव्हे आपले राष्ट्रीय जीवनच आपला धर्म आहे . हे योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, भविष्यकाळाचा विचार करता लाभाचे की बिनलाभाचे, ह्याची मला चर्चा करायची नाही . हे चांगले असो व वाईट असो; आहे हे असे आहे, त्यातून आपली सुटका नाही . हे आज असे आहे, ते भविष्यकाळातही तसेच राहणार आहे . तुम्हाला ते मान्य करावेच लागेल . माझी धर्मावर जेवढी श्रद्धा आहे तेवढी तुमची नसली तरी ! नियतीच्या योजनेने तुम्ही बांधलेले आहात . यातून स्वतःला सोडवून घेऊ पहाल तर शतशः खंडित व्हाल . आपल्या वंशाचे हेच जीवन आहे, त्याचाच आपण परिपोष केला पाहिजे .   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा