विवेकानंद अमृत २८९
मला क्षमा करा, पण आपले राष्ट्रीय साध्य चूक आहे असे म्हणणे हे केवळ अज्ञानाचे लक्षण आहे . प्रथम दुसऱ्या देशामध्ये जा, त्यांची संस्कृती स्वतःच्या डोळ्यांनी पहा . इतरांच्या दृष्टीकोनातून नको . तुम्हाला जर विचारशक्ती असेल तर त्यावर सखोल विचार करा . मग तुम्ही आपले स्वतःचे धर्मग्रंथ वाचा, आपले प्राचीन साहित्य वाचा, सर्व हिंदुस्थानभर प्रवास करा . सुबुद्ध आणि तीक्ष्ण दृष्टीच्या अभ्यासकाप्रमाणे या देशाच्या विविध भागांचा, येथील चालीरीती, रीतीरिवाज यांचा अभ्यास करा . म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ दिसून येईल की, हे राष्ट्र अद्यापी चैतन्यपूर्ण आहे . याच्या लोकजीवनात अजूनही तेच ते सनातन स्फुरण भरून राहिलेले आहे .
मला क्षमा करा, पण आपले राष्ट्रीय साध्य चूक आहे असे म्हणणे हे केवळ अज्ञानाचे लक्षण आहे . प्रथम दुसऱ्या देशामध्ये जा, त्यांची संस्कृती स्वतःच्या डोळ्यांनी पहा . इतरांच्या दृष्टीकोनातून नको . तुम्हाला जर विचारशक्ती असेल तर त्यावर सखोल विचार करा . मग तुम्ही आपले स्वतःचे धर्मग्रंथ वाचा, आपले प्राचीन साहित्य वाचा, सर्व हिंदुस्थानभर प्रवास करा . सुबुद्ध आणि तीक्ष्ण दृष्टीच्या अभ्यासकाप्रमाणे या देशाच्या विविध भागांचा, येथील चालीरीती, रीतीरिवाज यांचा अभ्यास करा . म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ दिसून येईल की, हे राष्ट्र अद्यापी चैतन्यपूर्ण आहे . याच्या लोकजीवनात अजूनही तेच ते सनातन स्फुरण भरून राहिलेले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा