मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९७

                        विवेकानंद अमृत २९७

     आपण आपल्या राष्ट्रीय चैतन्याचे प्राणपणाने जतन केले . त्यासाठी सर्वस्व समर्पण केले . म्हणूनच शतकानुशतके होत आलेले आघात आपण सोसू शकलो . आपल्या पूर्वजांनी त्यासाठी सारे काही सोसले . अगदी म्रुत्युसहि कवटाळले . आपले धर्मचैतन्य सांभाळले . परकीय आक्रमकांच्या बेबंद लाटेखाली मंदिरांमागून मंदिरे कोसळत होती . पण ती लाट परतून जाताच त्याच मंदिरांचे कलश पुन्हा एकदा उन्नत मस्तकाने उभे राहिले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा