बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९१

                       विवेकानंद अमृत २९१

     पर्वतश्रेष्ठाच्या कुशीतून निघून सहस्रो मैलांचा प्रवास करीत एक महान सरिताप्रवाह भूतलावर आला आहे . तो आता आपल्या मूलस्थानी जाऊ शकेल का ? आत्तापर्यंत क्रमलेली वाट पुन्हा उलटी शोधत जायचे म्हटले तर तो प्रवाह खंडित होईल, सुकून जाईल . महानदीने केव्हा-ना-केव्हा सागरालाच जाऊन मिळायला हवे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा