सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८२

                      विवेकानंद अमृत २८२

     अध्यात्मावर तुमचा विश्वास असो अगर नसो, तुम्हाला राष्ट्रजीवनासाठी अध्यात्माला दृढ धरून राहिलेच पाहिजे . एका हाताने आपले अध्यात्म घट्ट धरून ठेवा आणि दुसऱ्या हाताने अन्य वंशाकडून तुम्हाला जे काही घेणे शक्य आहे ते सर्व घ्या . मात्र आपल्या राष्ट्रीय जीवनध्येयापुढे अन्य सर्व गोष्टी दुय्यम आहेत हे विसरू नका . त्यातूनच हिंदुस्थानचा अपूर्व, भव्यतम भविष्यकाळ दृष्टीपथात येईल . माझी श्रद्धा आहे की तो निकट आहे . यापूर्वी कधीही नव्हते असे हिंदुस्थानचे उज्ज्वल उज्ज्वलतम चित्र मला दृष्टीपुढे दिसत आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा