रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १६


                        विवेकानंद अमृत - १६

     अत्यंत शांततेत आणि मौनात ज्याची प्रचंड कार्यशक्ती गतिमान असते आणि भोवती प्रचंड कर्म-कोलाहल सुरु असतानाही ज्याच्या अंतर्यामी निगूढ शांती आणि स्थिरता यांचे वास्तव्य असते तो मनुष्य आदर्श समजावा. तो स्वतःचा स्वामी आहे. त्याला संयमाचे रहस्य कळलेले आहे. मोठ्या रस्त्यांवरच्या गजबजलेल्या वाहतुकीतून तो चाललेला असला तरी निःशब्द गुहेत ध्यानस्थ बसल्यासारखे त्याचे मन स्थिर असते. तरीही तो सर्वकाळ अत्यंत कार्यमग्न असतो. हाच कर्मयोगाचा आदर्श आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा