शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - २०

                        विवेकानंद अमृत - २०

     आपल्याला काय लाभेल, त्यातील आपण काय ग्रहण करू शकू हे सारे आपले कर्मच ठरविते. आपण आज जे आहोत त्याला कारण आपणच आहोत. आणि जे उद्या व्हायची आपल्याला इच्छा आहे तसे स्वतःला घडविण्याचे सामर्थ्यही आपल्यातच आहे. आज आपण जे आहोत ते जर आपल्या पूर्वकर्माचे फळ असेल तर आपण उद्या काय असणार हे आपल्या आजच्या कृतीचे फळ असेल हे ओघानेच आले. म्हणून कर्माचे रहस्य आपल्याला कळले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा