गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत २५

                           विवेकानंद अमृत २५ 

     आपण संकटांना , प्रतिकूलतेला निमंत्रण देत असतो . आपले शरीर व्याधीला ग्रासंण्यासारखे झाल्याखेरीज व्याधी शरीरात प्रवेश करीत नाही . अमुक एका प्रकारच्या जंतूंमुळे रोग होतो हे पूर्ण सत्य नाही . आपल्या शरीराची स्थिती अशी झालेली असते की , जंतूंना ठाणे मांडायला अवसर मिळावा . आपली जी योग्यता असते तेच आपल्याला मिळते . सारा अभिमान सोडून आपण हे सत्य स्वीकारुया की , जे दुःख आपल्या वाट्याला येते ते आपणच ओढवून घेतलेले असते . आपल्यावर अमुक एक आघात झाला तो आपला काही एक दोष नसताना झाला हे खरे नाही . ' एकही अनिष्ट गोष्ट अशी नाही , जिच्याकडे मी माझ्या पायाने चालत गेलो नाही . ' हे सदैव स्मरणात ठेवले पाहिजे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा