विवेकानंद अमृत - १४
श्रेष्ठ महात्मे शांत आणि अज्ञात असतात. त्यांच्याजवळ विचारांची मोठी शक्ती असते. त्यांचा विश्वास असतो कि, ते गुहेत जाऊन दाराला शिळा लावून बसले आणि त्यांनी केवळ पाच सत्य विचारांचे प्रक्षेपण केले तरी ते पाच विचार चिरंतन होतील. ते महापर्वत उल्लंघून, महासागर ओलांडून सर्व जगतात संचारतील. मानवजातीच्या बुद्धीत आणि हृदयात ते सखोल जाऊन पोचतील आणि स्त्री-पुरुषांमध्ये त्या विचारांचे आचरण करण्याची प्रेरणा निर्माण करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा