रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १५


                          विवेकानंद अमृत - १५

     संतापाची प्रचंड लाट उसळून येते तेव्हा तिच्यावर संयम कसा करावा ?विरुद्ध भावाची एक लाट उत्पन्न करावी.शुभचिंतन करावे.एखादे वेळी पत्नी पतीवर फार संतापलेली असते आणि त्याचवेळी तिचे मूल लडिवाळपणाने जवळ येते तेव्हा क्रोधाची लाट मावळते.तिची जागा प्रेमाची नवी लाट घेते. स्तेयाचा विचार मनात आला की, अस्तेयाचा विचार मुद्दाम करावा. घेण्याची इच्छा झाली की, देण्याची इच्छा करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा