विवेकानंद अमृत - ५
प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय विचार असतो . विश्वधारणेसाठी असा विचार असणे आवश्यक असते . ज्या दिवशी विश्वधारणेसाठी हा विचार अनुपयुक्त होईल त्या दिवशी हा विचार करणारी व्यक्ती असो व राष्ट्र असो ते नष्ट होईल . दुःख, दैन्य, दारिद्र्य व देशांतर्गत, देशाबाहेरून अत्याचार होऊन सुद्धा हा देश जिवंत आहे . कारण या देशाचा राष्ट्रीय विचार विश्वधारणेसाठी आवश्यक आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा