शनिवार, २४ जानेवारी, २०१५

९ . भारतमाता

                              ९ . भारतमाता  
       भूतकाळाचा अभिमान, वर्तमानकाळाच्या परिस्थितीची वेदना व भविष्याबद्धल उत्कट ओढ देशभक्तीरुपी वृक्षाचा बुंधा व फांद्या आहेत . देशासाठी सर्वस्वाचा होम, स्वार्थाचे विस्मरण, श्रेष्ठ सेवा व उच्च कोटीची सहनशीलता हीच या वृक्षाची फळे होत . देशाच्या ठिकाणी मानवतेची अनुभूती घेणे, आईचे रूप पाहणे, तिचाच सतत ध्यास, आराधना व सेवा करणे हाच या वृक्षाला जिवंत ठेवणारा जीवनरस आहे .                                                                                                                                                            - योगी अरविंद 

 २
      भारत इस देश की जमीन यहाँ की नदियों और यहाँ के पहाड़ों का नाम नहीं है। इस देश के वासियों का सामूहिक नाम भी भारत नहीं है। भारत एक जीवित सत्ता है, यह सत्ता उतनी ही जीवित जागृत है जितने शिव आदि देवता। सभी देशोंकी अपनी अपनी आत्मा होती है और अगर तुम देश में परिवर्तन करना चाहते हो तो वह अवास्तविक होगा। भारत एक देवी है, अगर वह चाहे तो मानव रूप में प्रकट हो सकती है।                                                                                                                                                                                     - श्री मां 

       आज आपली भारतमाता आपल्याला हाक देत आहे . तिला दुसरे काही नको आहे. तिला तिचे तरुण, बुद्धिमान, सेवारत, पौरुषसंपन्न, पराक्रमी पुत्र हवे आहेत. नारायण म्हणजे शाश्वत ज्ञान आणि नर म्हणजे पराक्रम. जेथे या दोघांचा संगम होतो तेथे विजय निश्चित असतो. असे ज्ञान पौरुष संपन्न लोकच इतिहास घडवितात. भारतमातेला आज असेच पुत्र हवे आहेत.                                                                                          - श्रीगुरुजी 

४ 

      आम्ही राष्ट्र देवतेच्या उपासनी लागलो आहोत. यासाठी तन-मन- धन, बुद्धी, चित्त तसेच जे काही ईश्वर कृपेने आपणाला मिळाले आहे, ते सर्व त्याला समर्पित आहे. या प्रकारच्या शुद्ध भावनेला आम्ही आपल्या अंत करणामध्ये चांगल्या प्रकारे निर्माण करू आणि त्याचा विसर कधीही पडू देऊ नये.                                                                  - महर्षि अरविंद

    आपली मातृभूमी भारतमाता हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा आधार आहे. भूमी, आकाश आणि पाणी देऊन ज्याप्रमाणे तिने आपले पोषण केलेले आहे, तसेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांना तिने डोंगरकपारीत आश्रय दिलेला आहे. अनेक संत, सम्राट, वीर यांना जन्म देऊन तिने आपल्या पुत्रांचे पित्याप्रमाणे रक्षण केलेले आहे; शिवाय ज्ञान देऊन आपल्यालाच नव्हे तर जगालाही मार्ग दाखविलेला आहे. थोडक्यात, आपली मातृभूमी माता, पिता आणि गुरु यांची त्रिवेणी मूर्ती आहे. 

                                               - पू . श्रीगुरुजी 

६ 

      आमची ही वत्सल मातृभूमी वात्सल्याने परिपूर्ण असल्यामुळे आम्ही येथे सुखाने नांदत आलो आहोत. ही महन्मंगल पुण्यभू आहे. हिच्या सेवेसाठी आमचे जीवनपुष्प अर्पण करण्यास आम्ही सिद्ध आहोत. हिच्या सर्वंकष प्रगतीसाठी आमचे जीवनसर्वस्व वाहण्यास आम्हास धन्यता वाटते. 

हे प्रभो ! ही विश्वात सदैव अजेय राहो. त्यासाठी सामर्थ्य देण्यास तू समर्थ आहेस. या धर्माचे रक्षण आमच्याकडून होवो. परंतु हा मार्ग काट्याकुट्यातून जाणारा आहे याची आम्हाला जाणीव आहे. असा मार्ग आम्ही स्वयंप्रेरणेनेच स्वीकारण्याचे ठरविले आहे. यातच आमच्या जीविताचे सार्थक आहे. सर्वंकष भरभराटीच्या मार्गाने जाऊन त्यातून नि:श्रेयसाचा मार्ग स्वीकारण्यात आम्हाला धन्यता वाटते. हे राष्ट्र परमवैभवाप्रत नेण्यासाठी हे मातृभूमे तुझे आम्हाला सदैव आशिर्वाद लाभोत हीच आमची जीवनाकांक्षा आहे. 

         भूतकाळाचा अभिमान, वर्तमानकाळाच्या परिस्थितीची वेदना व भविष्याबद्धल उत्कट ओढ देशभक्तीरुपी वृक्षाचा बुंधा व फांद्या आहेत . देशासाठी सर्वस्वाचा होम, स्वार्थाचे विस्मरण, श्रेष्ठ सेवा व उच्च कोटीची सहनशीलता हीच या वृक्षाची फळे होत . देशाच्या ठिकाणी मानवतेची अनुभूती घेणे, आईचे रूप पाहणे, तिचाच सतत ध्यास, आराधना व सेवा करणे हाच या वृक्षाला जिवंत ठेवणारा जीवनरस आहे .

                                                                                                        - महर्षि अरविंद

८ 

     भारतात राहून सुद्धा जे लोक भारतमातेचा जयजयकार करण्यास कचरतात ते भारतीय झालेले नाहीत हे सत्य धूर्त इंग्रजांनी ओळखले.  ' एकजन ' ही भारताची एकरसतेची भावना नष्ट करण्यासाठी भारताला ' इंडिया ' म्हणण्यात त्यानी सुरुवात केली. आपल्या संविधानात ' इंडिया इज भारत ' असा आपल्या देशाचा उल्लेख केला गेला आहे.  त्यावरून इंग्रज आपल्या खेळीत किती यशस्वी झाले हे लक्षात येते. भारत हा शब्द इंग्रजांना उच्चारता येत नाही हे खरे नाही. वास्तविक भारतमातेचेच विस्मरण व्हावे ही त्यांची आंतरिक इच्छा होती. इंडिया म्हटल्यावर कोणी इंडियामाता म्हणू शकणार नाही व त्याचबरोबर भारतमातेच्या जयजयकाराचा आपोआप लोप होईल असा त्यांनी विचार केला.

                                             - पंडित दीनदयाळ उपाध्याय

९ 

     राष्ट्र का विकास एक ऐसी प्रगती है, जो आधुनिक अवस्था में मानवता के लिये अत्यंत आवश्यक है | मनुष्य के स्वार्थ, परिवार के स्वार्थ और वर्ग के स्वार्थ की गहरी जडें आज भी अतीत में जमीं हुई हैं |अब विशालतर राष्ट्रीय आत्मा में उन्हें अपने आपको विलीन करना सीखना होगा ताकि मानव जाती में भगवान का क्रम विकास हो सके | अत: इस युग का धर्म है राष्ट्रवाद | भगवान हमारी सार्वजनीन भारतमाता के रूप में अपने आपको हमारे सामने व्यक्त कर रहे हैं |

                                     - महर्षी अरविंद

१०

    आमची ही पवित्र मातृभूमी धर्म व दर्शन यांची भूमी आहे. ही महा मानवीय आध्यात्मिक महापुरुषांची जन्मभूमी आहे. अपरिग्रह व संन्यास यांची भूमी आहे. अगदी अति प्राचीन काळापासून आत्तापर्यंत केवळ येथेच मनुष्यप्राण्यासमोर उच्चतम आदर्श राहत आला आहे.

                                         - स्वामी विवेकानंद

११

      आमची ही मातृभूमी ' नानारत्नवसुंधरा ' आहे, म्हणजेच धनधान्याने परिपूर्ण आहे. हिच्यामुळे आमचे भरण पोषण होते. म्हणून ती आमची माता आहे. हिच्या आश्रयानेच आजपर्यंत आपण अनेक संकटांचा धैर्याने मुकाबला करू शकलो, म्हणून ही आमची रक्षणकर्ती म्हणजेच पितृतुल्य आहे. सृष्टीचे स्वरूप कसे आहे ? माणसाला शाश्वत सुख कसे प्राप्त होईल ? इ. बुद्धीच्या पलीकडील प्रश्नांचे समाधान करणारे व परमसुख देणारे अध्यात्मशील इथेच प्रगट झाले आणि त्याच्या प्राप्तीचा मार्गही या भूमीनेच दाखवला. म्हणूनही गुरुरुपिणी आहे. 

                                                        श्रीगुरुजी

१२

     हमारे लिए इस भूमी से पवित्रतर और कुछ नही हो सकता | इस भूमी की धुली का एक-एक कण जड और चेतक प्रत्येक वस्तू , प्रत्येक काष्ठ और प्रस्तर,  प्रत्येक वृक्ष एवं नदी हमारे लिए पवित्र है | हमारा देश हमारे लिए कभी निर्जीव अचेतन पदार्थ नही रहा, वरन् सदैव समान भावसे अपने बच्चों के लिए सजीव दिव्य मां के रूप मे रहा है, चाहे वे बच्चे निम्नतम वर्ग के हों अथवा उच्चतम वर्ग के |                                  - प. पू . डॉ. हेडगेवार

१३

     गरीब, अज्ञानी आणि दलित यांच्या बद्दल सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी सतत कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा वारसा मी तुम्हाला देत आहे. जे गरीब आहेत, जे दलित आहेत, जे खालच्या जातीचे समजले जातात त्यांच्यासाठी कष्ट करा. बलिदान करा. आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान करा. 

     बंधुंनो ! आपण सर्वजण सतत कार्य करूया ! ही झोप घेण्याची वेळ नाही. भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे. उठा ! जागे व्हा आणि आपल्या या भारत मातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुन्हा विराजमान झालेली पहा. तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या. आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल अशा अपूर्व तेजाने ती परत तळपून द्या.                                           -  स्वामी विवेकानंद

१४ 

       या भूमीला पवित्र मानणारा, तिला आपली माता, पिता, रक्षक, गुरु, सर्वश्रेष्ठ आणि तीच जगताचा मूलाधार आहे असे मानणारा तिचा पुत्ररुप हिंदू समाज आहे. हाच हिंदू वेदकाळापासून गर्जना करीत आला आहे की, ' ही माझी माता आहे व मी तिचा पुत्र आहे. ' माता भूमि: पुत्रो s हं पृथिव्या:                                                                     पू. श्री गुरुजी

१५

      ही आपली पवित्र भूमि आहे व तिची सेवा मला करायची आहे. आम्ही या भूमीचे-हिंदूराष्ट्राचे-तेजस्वी संतान आहोत, हिची सेवा करून विश्वात हिला सर्वश्रेष्ठ बनवणे हे आमचे परम कर्तव्य आहे. आपल्या सर्व शक्तीचा उपयोग हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठीच करून या हिंदू राष्ट्राला परमवैभवाच्या सर्वश्रेष्ठ पदावर सुप्रतिष्ठित करणे हीच आजच्या काळाची मागणी आहे.        प. पू. श्रीगुरुजी


७ . वर्षप्रतिपदा

                          ७ . वर्षप्रतिपदा 


८ . ध्येय

                                ८ .  ध्येय 

        आपल्या हिंदू राष्ट्राला सर्वांगीण वैभव प्राप्त करून देऊन त्याचे सर्वदिक् श्रेष्ठत्व पुन: प्रस्थापित करणे हे आपले एकमात्र परम लक्ष्य आहे. या लक्ष्याचे यथार्थ आकलन होण्यासाठी, आपल्या प्रार्थनेत आपण ज्याला ' परं वैभवन् ' म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय आहे ते नीट समजावून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राची ही परमवैभवसंपन्न स्थिती निर्माण करून ती सुस्थिर कशी करावयाची हेही समजावून घेतले पाहिजे.

२ 
       मनुष्याच्या स्वार्थावर नियंत्रण ठेवणे हे एक कठीण काम आहे. आपल्या देशातील विचारवंतांनी त्याच्या मार्ग सांगितला आहे, तो असा की मनुष्यासमोर एखादे श्रेष्ठ ध्येय ठेवले पाहिजे. असे ध्येय समोर असल्यास, ते प्राप्त करण्यासाठी मनुष्य पूर्ण सामर्थ्यांशी प्रयत्न करतोच. परिणामतः त्या श्रेष्ठ ध्येयासमोर स्वार्थ स्वाभाविक नगण्य ठरतो. मनुष्य स्वतः आपले दुर्गुण दूर करीत व सद्गुणांचा विकास करीत सुयोग्य बनण्याचा प्रयत्न करतो.

       वयम् उच्चतमं लक्ष्यम् आत्मनः पूरतः स्थापयेम | एतत्स्य लक्षस्य विषये यावत्पर्यंत शृणुयाम, यावत् अस्माकं हृदये, मस्तिष्के नाडीषुच तत् लक्षं स्थिरं तिष्ठेत यावच्च अस्माकं रकतस्य प्रत्येकास्मीन् कणे तत् च प्रविशेत्  यावच्च प्रतिरोमं न  संसक्तं  स्यात् | वयम् एतत् लक्ष्यम्  सदा ध्यायेम् | अस्माकं हृदय पूर्णत्वे वाणी प्रगती भवती हृदय पूर्णत्वेन एव वाणी प्रकटी भवति |  हृदय पूर्णत्वेन एवहस्तौ कार्य कुरुत: च |                         -  स्वामी विवेकानंद 

         वास्तवतेच्या चिखलातूनच जीवनाचे कमलपुष्प उमलते . परंतु ध्येयस्वरूपी सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानेच ते कर्मजीवनाच्या पृष्ठभागाच्याही वर येऊन कल्याणमय प्रसन्नतेचा विकास करू शकते . अत्यंत मलीन परंतु पोषण देणाऱ्या अशा चिखलापासून कमलपुष्पास वेगळे केले तर पाण्यावर तरंगत राहूनही ते सडून जाईल . सूर्यप्रकाशापासून त्यास नाना प्रकारे वंचित ठेवले तर त्या कमलपुष्पाचे अस्तित्वही असंभवनीय होईल . वास्तवता स्वीकारलीच पाहिजे परंतु त्यासमवेत ध्येयवादाची प्रेरणा स्वीकारणेच प्राणरूप होईल .                                                                                                                                                     -काका कालेलकर 


६. मकरसंक्रांती

                         ६.  मकरसंक्रांती

   १ 
    हिंदू  आज जगातील अनेक देशात जाऊन तेथील कायम रहिवासी झाला आहे. हिंदूंची जन्मजात समभावपूर्ण सहिष्णू मनोवृत्ती सर्वप्रकारे आपल्या राहत्या देशमातेची शक्ती वाढविण्यास यशस्वी ठरताना दिसते. ' स्वदेशे भुवनत्रयम ' आणि ' वसुधैव कुटुंबकम ' च्या आदर्शांना मानणाऱ्या हिंदूला त्या त्या देशांना आपले घर व तेथील रहिवाशांना आपलेच कुटुंबीय मानून आचरण करण्यात काहीही अडचण येऊ नये . 

४ . रक्षाबंधन

                               ४ .  रक्षाबंधन 

 
        ह्या भारतवर्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हिंदूंशी आपली वागणूक बंधुप्रेमाची असली पाहिजे. लोक कसे वागतात आणि काय बोलतात हा प्रश्न नाही. आपले आचरण जर सर्वस्वी दोषरहित असेल, तर आपले सर्व हिंदू बांधव आपल्याकडे आकर्षित झालेच पाहिजेत.                                                      - पू. डॉ. हेडगेवार 
            

१० . भगवा ध्वज

                           १० .  भगवा ध्वज

           स्वयंसेवकाची निष्ठा कोणत्याही एका व्यक्तीच्या ठिकाणी नको , माणसे येतात आणि जातात, माणसे स्खलनशील असतात,या भूमीचा अनादिकालापासूनचा इतिहास व येथे विकसित झालेल्या राष्ट्रीय संस्कृतिने शिकविलेली जीवनमूल्ये यांचे प्रतीक म्हणजे भगवा ध्वज, त्याचा यथोचित आदर आपण केला पाहिजे.                                                                                                                                           - डॉ. हेडगेवार 
          भगवा ध्वज आमच्या महान संस्कृतीचा पूर्ण परिचय करून देणारे प्रतीक स्वरूप आहे. आमच्यासाठी तो परमेश्वरस्वरूप आहे. म्हणून आम्ही त्याला आपल्या गुरुस्थानी ठेवणे अत्यंत योग्य समजत आहोत. त्याची सोनेरी भगवी कांती पवित्र यज्ञवेदींच्या पावन ज्वालांसमान आहे. भोगलालसेला मातीमोल करणाऱ्या संन्याशाच्या त्यागवृत्तीची द्योतक आहे. त्यागमय जनसेवा करण्याचे संकेतचिन्ह आहे.                                                                                                                                                                                                 - श्रीगुरुजी 
        संघाने आपला गुरु म्हणून शतकानुशतके चालत आलेला, तसेच प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा पराक्रम, पौरुष व बलिदानाचा साक्षी परमपवित्र भगवा ध्वज आपला गुरु मानला आहे. पूजा ही पूर्णत्वाचीच होते. आदर्श हा पूर्णत्वाचा असणे श्रेयस्कर आहे. या कारणामुळेच संघाने कोणत्याही व्यक्तीला गुरु मानलेले नाही. व्यक्ती कितीही स्थितीप्रत गेली तरी ' कर्मणा गहनो गती: ' या न्यायाने अध:पतीत होऊ शकते. तोच महापुरुष की ज्याचे सानिध्य आम्हाला सत्प्रवृत्त करते. अशा अनेक महापुरुषांना अनादी कालापासून जो मार्गदर्शन करीत आलेला आहे. तो जरी मूक असला तरी त्याला सर्वश्रेष्ठ गुरु मानले पाहिजे.

       सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या सर्व शक्तिना आव्हान देणाऱ्या या भगव्या ध्वजालाच आपण हृदयात स्थान देऊ. त्याचे समोर नतमस्तक होऊ. त्यालाच जीवन समर्पित करू या भावनेने या पवित्र ध्वजाचा आपण गुरु म्हणून स्वीकार केला आहे. आपल्या राष्ट्राला जगद्गुरुचे स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा संचय करण्याची शक्ती या ध्वजामुळे अंतःकरणात जागृत होते. आपल्या जीवन पद्धतीचा अखंड नंदादीप असणाऱ्या, राष्ट्रपुरुष समान भासणाऱ्या या ध्वजाच्या सेवेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यात आपल्याला आनंद आहे. या ध्वजाची पूजा करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.

         वेदकाळापासून आजपर्यंत आपण ज्या राष्ट्रीय प्रतीकापासून स्फूर्ती घेत आलो आहोत, ज्यामध्ये वर्षानुवर्षे उत्थान व पतनाच्या रोमांचकारी क्षणांच्या गाथा गुंफल्या आहेत. ज्याच्यामध्ये त्यागी, तपस्वी, पराक्रमी, दिग्विजयी, ज्ञानी, ऋषी, मुनी, सम्राट, सेनापती, कवी, साहित्यकार, संन्यासी आणि असंख्य कर्मयोग्यांच्या  चरित्राचे स्मरण अंकित आहे, जेथे प्रत्यक्ष अनुभूतीतून आपल्या जीवनाचा होम करणारी असंख्य उदाहरणे आमचे स्मृतिपटलावर नृत्य करतात तो परमपवित्र भगवा ध्वज हाच आमच्या अखंड राष्ट्रीय परंपरेचे प्रतीक म्हणून आमचे समोर आहे. तोच आमचे स्फूर्तिकेंद्र आहे. भगवा ध्वज हाच आमचा गुरु आणि मार्गदर्शक आहे.               पं. दीनदयाळ उपाध्याय

        आपल्या हिंदू राष्ट्रासंबंधीच्या अमूर्त भक्ती भावना साकार करण्यासाठी आपणाजवळ उपलब्ध असलेले व्यापक साधन म्हणजे आपला परमपवित्र भगवा ध्वज. तो राष्ट्राचे प्रतीक असून प्रत्येकास प्रेरणा देत असतो. या राष्ट्रध्वजामध्येच आपणास आपल्या देशाचा संपूर्ण इतिहास आढळतो. राष्ट्राचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही त्यात सामावलेला आहे. तोच आपल्या सांस्कृतिक परंपरेचे द्योतक आहे.                                                                                                                                   पंडित दीनदयाळ उपाध्याय
          भारताने जगाला गुलाम बनविण्यासाठी युद्धे केली नाहीत. युद्ध आत्मरक्षणार्थच झाली. परंतु आत्मरक्षणाचा अर्थ आपल्या तुच्छ ऐहिक जीवनाचे रक्षण असा नाही, तर आपल्या संस्कृतीचे रक्षण हाच राहत आला आहे. ' शरीर नश्वर व आत्मा अमर ' या तत्त्वाचा अंगीकार करून धर्म, संस्कृती आणि सभ्यता यांच्या रक्षणार्थ महान बलिदान घडले. हे सर्व आदर्श आपल्यापुढे ठेवणारे एखादे प्रतीक असल्यास त्यापासून अवश्य स्फूर्ती मिळते. यज्ञातील त्याग, तपश्चर्या, उद्योग आणि समर्पणशिलता या साऱ्या भावनांचा संस्कार हा ध्वज करतो, म्हणूनच अनादी काळापासून हा आमचा राष्ट्रध्वज आहे.                                                                        पं. दीनदयाळ उपाध्याय

           हम लोगों ने इस पवित्र पताका को अपने समक्ष गुरु के रूप में रखा है | इससे अति प्राचीन काल से आज तक के अपने राष्ट्र के सभी भव्य कार्य, उसके द्वारा संपादित समस्त पराक्रम और तेजेस्विता आखों के समक्ष प्रकट हो जाती है | जगद्गुरु का स्थान प्राप्त करने के लिए आवश्यक सभी गुणों का समुच्चय इस एक पताका के दर्शनमात्र से अपने अंत:करण में जागृत हो जाता है | यह तो हमारे जीवन-परंपरा की अखंड ज्योती के रूप में, हमारे राष्ट्रपुरुष अर्थात् प्रकट परमात्मा के नाते हमारे सामने है | इसकी सेवा के लिए हमें सब कुछ न्योछावर करने की आवश्यकता है |                                                                                              परमपूजनीय गुरुजी

१. प. पू . डॉक्टरजी

                           प. पू . डॉक्टरजी 

     आपल्या डॉक्टरांचे जीवन तत्वरूप बनले होते. त्यांचे जीवन भव्य, स्फूर्तिप्रद राष्ट्र्कार्याशी समरस,एकरूप झाले होते.अनेक श्रेष्ठ गुणांच्या पैलुंनी त्यांचे जीवन विकसित झाले होते. त्यांच्या श्रेष्ठतम जीवनाचा काही अंश आपणाशी प्राप्त व्हावा, त्यांच्यासारखे निरलस राष्ट्रभक्तीने ओथंबलेले अन्त्ह्करण लाभावे यासाठी आपण त्यांचे नित्य स्मरण केले पाहिजे. त्यांचे श्रेष्ठ गुण अंगी आणल्याने आपल्या राष्ट्राचे सुख समृद्धीयुक्त एकात्म जीवन निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येईल. 
           संघटन शास्त्राची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हे होत. त्यांचे जीवनात संघटनशास्त्राचे प्रत्यक्ष दर्शन घडते. आपण सद्गुणसंपन्न होऊन कसे जीवन जगावे याचा वस्तुपाठ आपण मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे जीवन चरित्राचे अभ्यासाने शिकतो. तसे संघटन कसे करावे याचा वस्तुपाठ आपण संघ संस्थापकांच्या जीवनचरित्रावरून समजू शकतो. 
                                                                              - प. पू . श्रीगुरुजी
     डॉक्टर कोरे चिंतक नव्हते त्यांनी व्यक्ती निर्माणाकरिता, व्यक्तीच्या सुधारण्यासाठी दैनिक शाखा या आगळ्या वेगळ्या पद्धतीचा विकास केला आणि स्वतःच्या उदाहरणाने हजारो अंत: करणामध्ये ' हिंदू संघटन ' या स्वप्नाला साकार करण्याचा संकल्प जागृत केला.                     - पू. बाळासाहेब देवरस
     ऐसे थे संघ के संस्थापक, हमारे डॉक्टरजी ! मनुष्य मात्र के जीवंत हिंदू आदर्श, ' क्रियासिद्धी सत्वे भवति महतां नोपकरणे ' महान व्यक्ती महान कार्यों की सिद्धी बाह्य साधनों से नही अपितु अपने अंतर्निहित शक्ती के द्वारा करते हैं | इस लोकोक्ति की पूर्ण अभिव्यक्ती, सभी पीढियों के लिए एक मार्गदर्शक ज्योतिपुंज- जिसके प्रकाश में वे अपने जीवन को एक गौरवमय अमर राष्ट्रीय जीवन की उपलब्धि के लिए ढाल सकें |.                            श्रीगुरुजी
          “परमपूज्य डॉक्टरजींचे हृदय मातृभूमीच्या उद्धारासाठी मरेपर्यंत तळमळत राहिले.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतभूमीसाठी अर्पण केले.डॉक्टरजींनी आपल्या आयुष्यातील क्षण - अन् - क्षण कारणी लावून,  हिंदू राष्ट्रात नवा प्रकाश पसरवून, हिंदू समाजाला एक नवी दृष्टी दिली.”                       भैय्याजी दाणी

३. गुरुपौर्णिमा

                             ३.  गुरुपौर्णिमा   
 
           आपण आयुष्यभर जो पैसा मिळवितो तो वस्तुतः भोवतालच्या समाजाचे सहकार्य असल्यामुळेच आपल्याला मिळत असतो. केवळ पैसाच नव्हे - जीवनातील सुरक्षितता आणि सुख या गोष्टीही समाजामुळेच आपल्याला लाभत असतात. त्यामुळे समाजाचे हे ॠण जास्तीतजास्त प्रमाणात फेडणे हे आपले कर्तव्य ठरते. रोज आपण एक तास शाखेत जाऊन तन-मन-बुद्धी अर्पण करतो यामागेहि  खरे म्हणजे समाजाचे हे ॠण फेडण्याचीच  भूमिका आहे . संघात स्वार्पणाचे हे जे संस्कार करण्यात येतात त्यामधूनच गुरुदक्षिणेची प्रथाही उदयास आली आहे.
         आपण राष्ट्रदेवतेची उपासना करतो म्हणून आपले शरीर, मन, बुद्धी, संपत्ती आणि तसेच आणखी जे काही ईश्वरकृपेने आपणास मिळाले आहे ते सर्व राष्ट्रासाठी समर्पित आहे, अशा प्रकारची विशुद्ध भावना आपल्या अंतःकरणात आपण निर्माण करावी. या गोष्टीचे कधी विस्मरण होऊ देऊ नये

  

२. हिंदुसाम्राज्यदिन

                                    २.  हिंदुसाम्राज्यदिन
                शिवाजी महाराजांना आदर्श ठेवले तर त्यांनी हिंदुत्वाच्या रक्षणार्थ जे पराक्रम केले ते आठवतात. जितके सामर्थ्य भगव्या ध्वजाचे आहे, तितकेच शिवरायांचे आहे. जो इतिहास ध्वजाच्या दर्शनाने आठवतो आणि त्यापासून जी स्फूर्ति  मिळते, तीच स्फूर्ति शिवरायांच्या चारित्र्यापासून मिळते.  जो ध्वज खरोखरच धुळीत पडला होता, तो शिवरायांनी उचलून हिंदू पदपादशाहीची प्राणप्रतिष्ठा केली व मरु घातलेले हिंदुत्व जागवले. तेव्हा तुम्हाला जर व्यक्ती आदर्श ठेवायची असेल, तर शिवरायांनाच ठेवा.            - पू . डॉक्टरजी  

         
   हिंदू समाजाला चिरंतन दास्यात जखडून टाकण्यासाठी जे जे म्हणून विधर्मी हिंदुस्थानात आले आणि राहिले आहेत, त्याच्या उद्दंड आक्रमणापासून हिंदू समाजाला वाचविणे, हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी कितीही कष्ट सोसावे लागले तरी आम्ही ते सोसू ; कितीही संकटे झेलावी लागली तरी आम्ही ती झेलू . एवढेच नव्हे तर त्यासाठी आत्मबलिदानही करू , अशी मनोवृत्ती संपूर्ण हिंदुसमाजात निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. हिंदुसंघटनेचे पवित्र कार्य या ध्येयप्राप्तीसाठीच आहे. 

५. विजयादशमी

५.  विजयादशमी 
           आपले कार्य श्रेष्ठ आहे,महान आहे, ईश्वरी आहे म्हणून उठा आणि नेटाने कामाला लागा. सत्य आपल्या बाजूला आहे. अन्याय सहन करीत झोपून राहाणे हे पाप होय. त्यासाठी भारतमातेचे ध्यान करून तिच्या प्रेमाने प्रेरित होऊन उठा आणि कार्यविस्तार करा. विजय निश्चित आहे. कारण जेथे धर्म असतो तेथे भगवंत असतात. आणि जेथे भगवंत असतात तेथे विजय असतोच.                                                         -  प. पू . श्रीगुरुजी 

          वास्तविक पाहता सहिष्णुतेप्रमाणेच विजिगिषु वृत्ती ही आवश्यक आहे आणि जर असे म्हटले की विजिगिषु वृत्तीची अधिक आवश्यकता आहे, तर ते खोटे नाही. विजिगिषु भावनेशिवाय कोणताही समाज जिवंत राहू शकत नाही आणि आपला विकासही करु शकत नाही.                                                                                    - दीनदयाळ उपाध्याय 

     आपण आपल्या सेवावृत्तीने, परिश्रमाने समाजात उत्पन्न झालेली अविश्वासाची भावना दूर केली पाहिजे. आपल्या कार्याची पूर्णतः भावात्मक भूमिका सर्वांना समजावून सांगितली पाहिजे. जे आपला विरोध करताना दिसतात त्यापैकी सर्वच एकजात अप्रामाणिक नाहीत. त्यांच्याशी चांगले स्नेहाचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. अखेर विजय आपलाच आहे. कारण सत्य व धर्म आपल्या बाजूला आहे. ' यतो धर्मस्ततो जय: ' हा पक्का विश्वास ठेवा. आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि समाजाविषयीच्या निरपेक्ष प्रेमभावनेतून केलेल्या कार्यामुळे आपण भारताचे भाग्यविधाते ठरणार आहोत. नव्या वैभवशाली भारताची उभारणी करणार आहोत. विरोध व संकटे यांना तोंड देत, त्यासाठी अमर्याद परिश्रम करण्याचा संकल्प या विजयादशमीच्या शुभदिनी करूया. हेच आपले सीमोल्लंघन.

    हिंदुराष्ट्राला सुसंघटित करण्याला डॉक्टरांनी प्रारंभ केला तो त्यांच्या विजयाकांक्षी मनोरचनेशी सुसंवादी अशा सीमोल्लंघनाच्या मुहूर्तावर ! व्यक्तिगत जीवनातून समष्टी जीवनाकडे, दास्यातून स्वातंत्र्याकडे, निद्रेतून जागृतीकडे, दैन्यांतून स्वर्गतुल्य सुखाकडे व दौर्बल्यातून दिग्विजयी तारुण्याकडे साऱ्या हिंदुसमाजाला नेणारे सीमोल्लंघन डॉक्टरांनी या दिवशी सुरू केले. प्रभु रामचंद्रांनी रावणाला रामबाणाचा प्रताप याच दिवशी दाखविला होता आणि महिषासुराचा वध ही दुर्गामातेने याच दिवशी केला होता. दुष्टांना भयकंपित करणारे बलिष्ठ हिंदुराष्ट्र जागृत करण्याला अशा विजयांचे स्मरण करून देणाऱ्या विजयादशमीहून कोणता मुहूर्त अधिक समर्पक ठरला असता ?