१४६ राष्ट्रीय स्वाभिमान
१
राष्ट्रीय स्वाभिमान ही कोणत्याही स्वतंत्र देशाच्या दृष्टीने कमी महत्त्वाची गोष्ट नसते. या स्वाभिमानातच एक आत्मीयता दडलेली असते. या आदमी आत्मियतेतच कार्याच्या प्रेरणाचे तत्व सुप्तपणे अस्तित्वात असते. त्यालाच अहं म्हणतात. ही ' अहम् ' भावनाच राष्ट्रघटकांना नवनिर्माणाची आणि नवनवीन अविष्कारांची प्रेरणा देते. या आधारावरच स्वतंत्र राष्ट्रे कठीण प्रसंगात असे काही साहसी निर्णय घेण्यात यशस्वी होतात की त्यांची गणना ' ऐतिहासिक ' निर्णय म्हणून केली जाते. म्हणूनच हे निश्चित समजले पाहिजे की विदेशी विचारप्रवाह व ' वाद ' यांचे ओझे ओढत राहणे राष्ट्रीय स्वाभिमानास शोभणारी गोष्ट नाही. पं. दीनदयाळ उपाध्याय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा