रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

१४६ राष्ट्रीय स्वाभिमान

                                                     १४६   राष्ट्रीय स्वाभिमान 

        राष्ट्रीय स्वाभिमान ही कोणत्याही स्वतंत्र देशाच्या दृष्टीने कमी महत्त्वाची गोष्ट नसते. या स्वाभिमानातच एक आत्मीयता दडलेली असते. या आदमी आत्मियतेतच कार्याच्या प्रेरणाचे तत्व सुप्तपणे अस्तित्वात असते. त्यालाच अहं म्हणतात. ही ' अहम् ' भावनाच राष्ट्रघटकांना नवनिर्माणाची आणि नवनवीन अविष्कारांची प्रेरणा देते. या आधारावरच स्वतंत्र राष्ट्रे कठीण प्रसंगात असे काही साहसी निर्णय घेण्यात यशस्वी होतात की त्यांची गणना ' ऐतिहासिक ' निर्णय म्हणून केली जाते. म्हणूनच हे निश्चित समजले पाहिजे की विदेशी विचारप्रवाह व ' वाद ' यांचे ओझे ओढत राहणे राष्ट्रीय स्वाभिमानास शोभणारी गोष्ट नाही.                                                                    पं. दीनदयाळ उपाध्याय      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा