८३ . मनुष्य निर्माण
१
प्रत्येक सामाजिक संघटन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपाने मनुष्य निर्माण करण्यावरच जोर देत आहे. संपूर्ण मानवी प्रयत्नांमध्ये मनुष्य निर्माण हाच आधारभूत हेतू आहे. सुयोग्य व्यक्ती तयार झाल्याने समाज आणि राष्ट्र सुद्धा पूर्ण रूपाने तयार होईल. एक जुनी म्हण आहे. ' पै पै ची चिंता करा की रुपया आपोआप तयार होईल ' राष्ट्राची किंवा विश्वाची निर्मिती असो, सुयोग्य व्यक्ती निर्माण होणे हीच आधारभूत प्रक्रिया आहे. मनुष्याची चिंता कराल तर समाजही आपल्या स्वतःची चिंता करील. इतर सर्व व्यवस्था आणि साधने मग गौण आहेत. - श्री. एकनाथजी रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा